कांद्याची आयात आणि राज्यभरात कांद्यांच्या घसरलेल्या भावावरून नाशिक येथे ९ सप्टेंबरपासून केंद्र सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रविवारी दिला. केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवर त्वरित बंदी घालावी, तसेच कांदा निर्यातीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणीदेखील राजू शेट्टी यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रातील महायुतीच्या घटकपक्षांचा भाग असल्यामुळे विधानसभेच्या तोंडावर महायुतीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतक-यांच्या प्रश्नांची योग्य ती दखल न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका पडू शकतो असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा