शिवसेना ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. मूळ शिवसेना कोणाची हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. तर निवडणूक आयोगानं शिंदे गटाच्या बाजुने निर्णय दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना रामदास आठवलेंनी मोठं विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकालही एकनाथ शिंदे यांच्या बाजुने लागेल, असं विधान रामदास आठवले यांनी केलं.

रामदास आठवलेंनी संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ विधानाचाही समाचार घेतला. “चोर कोण आहे? ते सगळ्यांनी पाहिलं आहे. तुरुंगात कोण जाऊन आलं, हेही सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे विधिमंडळाला चोर म्हणणं, ही गोष्ट अजिबात बरोबर नाही,” अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली. ते नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
uddhav thackeray sharad pawar
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”

हेही वाचा- “संजय राऊत हे महाराष्ट्रात आग लावत फिरणारं कार्टं”, शहाजी बापू पाटलांची खोचक टीका!

यावेळी कविता सादर करत रामदास आठवले म्हणाले, “ते ४० जण नाहीत चोर… संजय राऊतांनी करू नये शोर… संजय राऊतांनी कितीही शोर केला तरी ते ४० आमदार हिंमतवाले आहेत. ते उद्धव ठाकरे यांना आव्हान देऊन बाहेर पडलेले आमदार नाहीत. उलट उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनाच त्यांनी शिवसेनेतून बाहेर केलं. ते शिवसेनेतून बाहेर पडले नाहीत.”

हेही वाचा- संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ विधानावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया, कविता सादर करत घेतला समाचार

“निवडणूक आयोगानं शिंदे गटाच्या बाजुने निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयातही एकनाथ शिंदेंच्या बाजुने निकाल लागेल, असा आम्हाला विश्वास आहे. एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंची खोटी शिवसेना आहे. त्यामुळे त्यांना (उद्धव ठाकरे) आता शिवसेनेचं नाव वापरण्याचा अधिकार राहिला नाही. हा उद्धव ठाकरेंच्या आयुष्यातला अत्यंत जबरदस्त धक्का आहे. त्याला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेच जबाबदार आहेत. त्यांनी २०१९ मध्ये भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला नसता आणि भाजपाबरोबरची युती तोडली नसती, तर उद्धव ठाकरेंवर ही नामुष्कीची वेळ आली नसती,” असंही रामदास आठवले यावेळी म्हणाले.

Story img Loader