राज्यातील सत्तांतरानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचाली वाढल्या आहेत. मंत्रीपदांच्या वाटपासाठी शिंदे आणि भाजपा यांच्यात दिल्लीमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे लवकरच त्यासाठी तारीख निश्चित केली जाऊ शकते. शिंदे-भाजपा यांच्या संयुक्त सरकारमध्ये मनसेलाही मंत्रीपद मिळू शकते, असे म्हटले जात आहे. असे असताना आता भाजपाचा सहयोगी पक्ष आरपीआयचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मनसेला मंत्रीपद देण्यास आमचा विरोध आहे, असे आठवले म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> सुनावणी लांबणीवर?; राज्यातील सत्तासंघर्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

Legislative Council Chairman Ram Shinde testimony regarding the work of the society Pune news
मंत्री नसलो तरी सगळ्या मंत्र्यांकडून काम करून घेऊ; विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Chandrakant Patil demand to Deputy Chief Minister Eknath Shinde regarding the traffic congestion problem Pune news
अजित पवारांपाठोपाठ चंद्रकांतदादा भेटले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली ही मागणी !
Shiv Sena mouthpiece claims tension between Fadnavis and Shinde
एसटी महामंडळातील नियुक्तीवरून मुख्यमंत्र्यांची शिंदे गटावर कुरघोडी
Eknath Shindes statement said beloved brother is bigger than post of Chief Minister or Deputy Chief Minister
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदापेक्षा लाडका भाऊ मोठा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान
SIT probes conspiracy against Devendra Fadnavis Eknath Shinde Mumbai news
फडणवीस, शिंदेंविरोधातील कारस्थानाची ‘एसआयटी’ चौकशी; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकरण
Devendra Fadnavis On Ramdas Kadam
मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन
stalled housing projects in mumbai will be completed in phased manner says dcm eknath shinde
मुंबई बाहेर फेकले गेलेल्यांना पुन्हा मुंबईत आणणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“मनसेला मंत्रीमंडळात घेण्याचा संबंध येत नाही. मनसे वेगळा पक्ष आहे. हा पक्ष शिवसेना, भाजपा किंवा आमच्यासोबतही नाही. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळात घेण्याचा प्रश्नच येत नाही. निवडणुकांमध्ये ते आमच्यासोबत नव्हते. असे होत असेल तर आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही,” असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> “मध्यावधी निवडणुका लागतील असं म्हणालोच नाही,” शरद पवार यांचे स्पष्टीकरण

कल्याण ग्रामीण या मतदारसंघातून निवडून आलेले राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. त्यांनी राज्यसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला. तसेच नवीन शिंदे सरकारचा राष्ट्रवादी, काँग्रेसला शह देणे एवढाच कार्यक्रम असल्याने आपल्यात दुही कशासाठी? असा विचार करून भाजप, शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी सामोपचाराने काम करून विकास कामांबरोबर आपले राजकीय इप्सित साध्य करू, अशी चर्चा या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ वर्तुळात सुरु आहे. याच कारणामुळे मनसेला भाजपाच्या कोट्यातून मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. मनसेचा आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा तसेच कल्याण ग्रामीणमध्ये मनसे, शिवसेनेत असलेली धुसफूस कायमची संपुष्टात आणण्यासाठीही हे मंत्रीपद दिले जाऊ शकते.

हेही वाचा >>> औरंगाबादच्या नामांतरावर राष्ट्रवादी नाराज? शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्ट केली भूमिका, म्हणाले “याची यत्किंचितही…”

दरम्यान, सध्या राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार? याबाबतची निश्चित तारीख समोर आलेली नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच दोन दिवसीय दिल्ली दौऱ्याहून परतले आहेत. या दौऱ्यात खातेवाटपाचा फॉर्म्यूला ठरला असावा, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

Story img Loader