“राज ठाकरे हा कोणाचंही न ऐकणारा नेता असून त्यांच्या भूमिकेला भाजपाचा पाठिंबा नाही,” असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. रविवारी सांगली येथे पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केलं. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, असंही ते यावेळी म्हणाले.

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून बाळासाहेबांना धोका दिला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचं नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही. अंगावर त्यांनी भगवे वस्त्र धारण केलं, ते चांगलं आहे. पण राज ठाकरेंनी शांततेची भूमिका घ्यावी. त्यांनी पक्ष स्थापन करताना सर्व रंगाचे झेंडे आणले होते. पण आता केवळ भगवा रंग परिधान केला आहे. त्यांनी शांततेसाठी काम करायला हवं, पण भगव्या रंगाच्या विरोधात त्याचं काम सुरू आहे, अशी टीकाही आठवले यांनी केली.

Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
lokmanas
लोकमानस: लोकशाही की एकाधिकारशाही?
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान

काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाबरोबर मी होतो. पण त्यांचा सिम्बॉल घेऊन मी निवडणूक लढवली नाही. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सिम्बॉल घेऊन निवडणूक लढवणार असल्याचंही रामदास आठवले यांनी सांगितलं.

महाविकास आघाडी सरकारच्या कामांबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, “महाविकास आघाडीचं सरकार जनतेला न्याय देण्यात अपयशी ठरलं आहे. या सरकारमधील नेते एकमेकांवर कुडघोड्या करण्याचं काम करत असतात. या सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला डावललं जातं. प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, अशी विनंती मी त्यांना करणार आहे. सरकार पडल्यानंतर सरकार बनवण्याची आमची तयारी आहे. ब्राम्हण समाजाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, याला माझाही पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे नेते आहेत.

Story img Loader