दापोली येथील कथित साई रिसॉर्टच्या गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना ( शिंदे गट ) ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) अलीकडे अटक केली आहे. सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटकेमागे रामदास कदम यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी केली. याला आता रामदास कदम यांनी प्रत्युत्तर देत शिवसेना ( ठाकरे गट ) नेते अनिल परब यांना लक्ष्य केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास कदम म्हणाले, “सदानंद कदम यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईत माझं हात, पाय आणि डोकेही नाही. महाराष्ट्राला माहिती आहे, मी समोर अंगावर जातो, पाठीत खंजीर खुपसण्याचं काम कधीच केलं नाही. ईडी माझं ऐकणारी असती, तर अनिल परबांना आतमध्ये टाकण्यास सांगितलं असतं. कारण, अनिल परबांनी माझ्या मुलाला प्रचंड त्रास दिला. राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला होता. उद्धव ठाकरेंनी अनिल परबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याचा प्रयत्न केला.”

Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Pankaja Munde Speech And Suresh Dhas Speech News
Politics : सुरेश धस देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले ‘बाहुबली’; पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी शिवगामी, मेरा वचनही है शासन”
MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार झालेला कृष्णा आंधळे कोण? सुरेश धस यांनी दिली महत्त्वाची माहिती

हेही वाचा : शीतल म्हात्रे प्रकरणाला वेगळं वेळण, प्रियंका चतुर्वेदींनी केली प्रकाश सुर्वेंच्या मुलाच्या अटकेची मागणी; नक्की काय म्हणाल्या?

“अनिल परबांनी सदानंद कदमांना फसवलं आहे. हे स्वत: वकील असल्याने सर्व कागदपत्रे स्वत:च्या नावावर ठेवली नाहीत. परवानगीचा अर्ज आणि लाईट बिल अनिल परबांच्या नावावर आहे. सदानंद कदमांना यांना अनिल परबांनी बळीचा बकरा बनवलं आहे. सदानंद कदमांचा काही संबंध नसेल तर निश्चित ते बाहेर पडतील. याप्रकरणात अनिल परबांची सखोल चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी रामदास कदमांनी केली.

हेही वाचा : “जगताप कुटुंब फोडण्यासाठी…”, लक्ष्मण जगताप यांच्या बंधुने व्यक्त केली खदखद; म्हणाले…

खेडमधील सभेबद्दल विचारलं असता रामदास कदमांनी सांगितलं, “उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांचा धसका घेतला होता. त्यांना अख्ख्या महाराष्ट्रातून लोक बोलवावी लागली. त्यांच्या पाठीशी कोकण नव्हतं, उभा महाराष्ट्र होता. १९ तारखेला होणार सभा कोकणवासीयांची असणार आहे. कोकणवासीय एकनाथ शिंदे आणि माझ्या पाठीशी खंबीर उभे आहेत,” असा विश्वास रामदास कदमांनी व्यक्त केला.

Story img Loader