ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या गटासह भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. आपण कोकणातील लोकांना भेटण्यासाठी आलो आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. या भाषणानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली.

उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडताना रामदास कदम म्हणाले, “आहो, उद्धवजी तुम्ही मला सांगा, तुम्ही मुख्यमंत्री असताना कोकणात प्रचंड वादळं आली. कोकणाची किनारपट्टी सगळी उद्धवस्त झाली. तेव्हा शरद पवारांसारखा ८२ वर्षांचा वयस्कर माणूस चार दिवस कोकणाला न्याय देण्यासाठी आला. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे नेतेही आले. तेव्हा तुम्ही बापलेक आलात का? का आला नाहीत?”

Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”
Kirit Somaiya criticizes Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे सध्या तडफडत आहेत कारण… किरीट सोमय्यांनी थेट…
Image Of Rajeev Shukla
“काँग्रेस असो वा भाजपा, हा व्यक्ती…” कोल्ड प्लेच्या गायकाबरोबर राजीव शुक्लांचा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर मीम्सचा पूर
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
ashish shelar uddhav thackeray (2)
“करगोटा निसटायच्या वयात…”, शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…”
uddhav thackeray sharad pawar
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”

हेही वाचा- “…तर अजित पवार नक्की मुख्यमंत्री झाले असते” रामदास कदमांचं मोठं विधान

उद्धव ठाकरेंना उद्देशून रामदास कदम पुढे म्हणाले, “काल तुम्ही म्हणाले, कोकण माझा बालेकिल्ला आहे. पण कोकणचा माणूस अडचणीत होता. माझा मच्छिमार अडचणीत होता. तेव्हा तुझा कोकण कुठे गेला होता रे बाबा… तेव्हा योगेश कदम याने पुढाकार घेतला. मी स्वत: अजित पवारांना फोन केला. केंद्र सरकारचे निकष बदलून वादळात अडकलेल्या मच्छिमारांना आम्ही बापलेकांनी मदत केली. योगेश कदम रात्रंदिवस काम करत होता. मी आजारी असतानाही दापोलीत येऊन बसलो होतो. तेव्हा तुम्ही बापलेक कुठे होता?”

हेही वाचा- “उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा, पण…”, २०२४ च्या निवडणुकीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान

“जगाच्या इतिहासात बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री आणि नेता बाहेर… हे पहिल्यांदा घडलं असेल. तुम्ही तुमची हौस भागवून घेत आहात काय? कोकणातील लोकांना भावनात्मक आवाहन करायचं थांबवा. आता हळुहळू महाराष्ट्राच्या जनतेलाही उद्धव ठाकरे काय आहेत, हे समजेल,” अशा शब्दांत रामदास कदमांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला.

Story img Loader