ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा घेणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यानंतर उद्धव ठाकरेंची ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे या सभेतून उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सभेआधी रामदास कदम यांनी ठाकरे गटाला इशारा दिला आहे. माझ्यावर काहीही आरोप केले तर मानहानीचा दावा ठोकणार, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

खरं तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम हे आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय कदम यांनी आज सकाळी रामदास कदम व त्यांचे पुत्र योगेश कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधला. रामदास कदम हे बंगाली बाबा आहेत. ते पर्यावरण खात्याचे मंत्री असताना मिळालेल्या पैशांतून त्यांनी आपला मुलगा योगेश कदम यांना आमदार केलं, असा आरोप संजय कदम यांनी केली. पण आरोपानंतर उद्धव ठाकरेंच्या सभेआधी रामदास कदम यांनी इशारा दिला आहे.

raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
ashish shelar uddhav thackeray (2)
“करगोटा निसटायच्या वयात…”, शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…”

संजय कदम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना रामदास कदम म्हणाले, “मला वाटतं की, त्यांचा अजिबात अभ्यास नाही. गावठी आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. पाच वर्षात ते विधिमंडळात कितीवेळा बोलले, याची माहिती काढा, म्हणजे कळेल. मुळात पर्यावरण खात्याला आर्थिक निधीची कोणतीही तरतूद नव्हती. तसेच हे खातंही अस्तित्वात नव्हतं. पर्यावरण खातं हे वेगळं कधीच नव्हतं.

हेही वाचा- ‘एकनाथ शिंदेंकडे कागदावरची शिवसेना’, संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा

“वन आणि पर्यावरण विभाग असं हे खातं होतं. ते तोडून बाजुला केलं. मला काहीतरी द्यायला पाहिजे, म्हणून उद्धव ठाकरेंनी ते खातं मला दिलं. त्याला शून्य बजेट होतं. पण तलावाच्या सुशोभीकरणासाठी मुनगंटीवारांना सांगून मी निधी घेतला आणि तलावाची कामं केली. तुम्ही जो प्रश्न मला विचारला आहे, त्याबाबत मी न्यायालयात जाणार आहे. त्यांच्यावर मी १०० टक्के मानहानीचा दावा ठोकणार आहे,” अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली.

Story img Loader