शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आज शिवसेना(ठाकरे गट) नेते अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना फोडण्याचं पाप अनिल परब यांनी केलं आहे, दिवस बदलत असतात आणि ते तुम्ही आता भोगताय. असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रियात देताना रामदास कदम यांनी दावा केली की, “शिवसेनेचा सत्यानाश, शिवसेना फोडण्याचं पाप आणि उद्धव ठाकरेंना चुकीचे सल्ले देण्याचं पाप अनिल परबांनी केलं आहे. अनिल परबांमुळेच सगळी शिवसेना फुटली आहे. हे सगळं पाप त्यांचं आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
ashish shelar uddhav thackeray (2)
“करगोटा निसटायच्या वयात…”, शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…”
kareena kapoor angry on paparazzi post
“हे सगळं थांबवा”, पती रुग्णालयात अन् मुलांबद्दलची ‘ती’ पोस्ट पाहून करीना कपूर खान संतापली; म्हणाली, “आम्हाला एकटं सोडा…”
Shiv Sena is unhappy after Yogesh Kadam from Ratnagiri district was left out of the list for the post of Guardian Minister
योगेश कदम यांना डावलले
Uddhav thackeray amit shah saif ali khan attacker
“ही देशाच्या गृहमंत्र्यांसाठी शरमेची बाब”, सैफवर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोर असल्याचं समजताच ठाकरे गटाचा हल्लाबोल

हेही वाचा – “याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले, पक्षाची…” आशिष शेलारांची संजय राऊतांवर टीका!

याचबरोबर “दिवस बदलत असतात म्हणूनच मुख्यमंत्री पदावरून खाली उतरावं लागलं. माझ्या मुलाला जो त्रास दिला तो मरेपर्यंत मी कदापि विसरणार नाही. जो मला त्रास दिला आहे तो मरेपर्यंत मी कदापि विसरणार नाही. हेच माझं म्हणणं आहे की होय दिवस बदलत असतात आणि ते तुम्ही आता भोगताय, अनुभवताय. मी हेदेखील सांगतो की या ४० आमदारांपैकी एकही आमदार पडणार नाही.” असा विश्वासही यावेळी रामदास कदम यांनी व्यक्त केला.

याशिवाय, “त्यांचं जे सुरू आहे ना खोके-खोके, गद्दार-गद्दार, कुणी केली गद्दारी? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बेईमानी आणि गद्दारी करण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं आहे. उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले आहेत आणि काँग्रेस, राष्ट्रवादीकडे शिवसेना गहाण ठेवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे.” असा आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

Story img Loader