भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा-शिवसेनेमधील (शिंदे गट) जागावाटपावरून केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका सुरू केली आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी “फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे हे लोक आहेत” अशा शब्दात शिंदे गटावर हल्लाबोल केला. यावर आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर मिळालं आहे. रामदास कदम यांनी आज संजय राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

शिवसेना आमदार (शिंदे गट) रामदास कदम म्हणाले की, “आपणा सर्वांना माहिती आहे शरद पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय, हे उभा देश ओळखतो. ज्याला कावीळ झालेली असते त्याला जग पिवळं दिसतं. म्हणूनच संजय राऊतांनी असं काहीतरी बोलणं हे हास्यास्पद आहे.”

Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”
Uday Samant on Eknath Shinde
Sanjay Raut: “एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीसांना नकोसे, लवकरच मोदींना…”, संजय राऊत यांचा दावा
Sanjay Raut on uday Samant
“एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच ‘उदय’ होणार होता”; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ; राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता?

रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

रत्नागिरीमधल्या खेड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या आयोजनासाठी रामदास कदम खेडमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच संजय राऊतांवर देखील हल्लाबोल केला.

हे ही वाचा >> “…आणि २१ लाख रुपये घेऊन जा” अंनिसचं पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्रींना जाहीर आव्हान

रामदास कदम म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांची खेड येथे सभा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले माझ्या हातात काही नाही, मी रिकाम्या हातांनी आलोय. परंतु मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांच्या कार्यकाळात लोकांना देण्यासाठी त्यांच्या हातात पुष्कळ गोष्टी होत्या. परंतु त्यांनी त्या दिल्या नाहीत.”

Story img Loader