भाजपाचे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांमध्ये केलेल्या टीकेवरून आता नवा राजकीय वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे. रावसाहेब दानवेंच्या या विधानानंतर आता भाजपा व काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे. “रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वापरलेली भाषा त्यांचा कुसंस्कृतपणा दाखवतो.” अशा शब्दांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीक केल्यानंतर, त्याला भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. “काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आडाणी भाषेत भाजपा नेत्यांवर टीका करतात, ते जमतं मग मंत्री रावसाहेब दानवेंनी केलेली टीका केली तर मिरच्या झोंबल्या का?” असा सवाल भाजप प्रवक्ते राम कुलकर्णीं यांनी केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा