रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याकडे महायुती सरकारमध्ये सध्या उद्योगमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत फुट पडल्यानंतर उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले. उदय सामंत यांची रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर पकड आहे. २०१९ मध्ये सलग चौथ्यांदा ते या मतदारसंघातून विधानसभेवर निवडूण गेले. उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून २००४ आणि २००९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ आणि २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढवली. दोन्ही निवडणुकांमध्ये ते विजयी झाले.

२०२४ मध्ये झालेल्या रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव केला. उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना ५० हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत यंदा चुरस पाहायला मिळाली. महायुतीत रत्नागिरीची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्यानंतर उदय सामंत यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, विधानसभा निवडणुकांपूर्वी रत्नागिरीत भाजपामध्ये मोठी फूट पडली होती. भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी बंडाचा झेंडा फडकावत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला व उमेदवारी मिळवली. त्यामुळे रत्नागिरीत उदय सामंत विरुद्ध बाळ माने असा सामना रंगला होता.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “…अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार”, आदित्य ठाकरेंचा इशारा; मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरही टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
rahul gandhi Arvind Kejriwal Sattakaran
राहुल गांधींच्या रडारवर केजरीवालच का? काँग्रेसचं राजधानीत पुनरागमनासाठीचं धोरण काय?
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Raj Thackeray
Raj Thackeray : “अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो, पण आमच्या वाट्याला फक्त…”, राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला

हेही वाचा : Malegaon Outer : मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघावर दादा भुसेंचं वर्चस्व नेमकं कसं आहे? जाणून घ्या

उदय सामंत यांचा दणदणीत विजय

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात सर्वाधिक १ लाख ११ हजार ३३५ मते मिळवून उदय रविंद्र सामंत हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी घोषित केले. बाळ माने यांना दुसऱ्या क्रमांकाची ६९ हजार ७४५ इतकी मते मिळाली. विधानसभा निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाचे उदय रविंद्र सामंत – १ लाख १० हजार ३२७, टपाली मते-१ हजार ८ अशी एकूण १ लाख ११ हजार ३३५ मते पडली. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे बाळ माने यांना ६८ हजार ८५४, टपाली मते- ८९१ अशी एकूण ६९ हजार ७४५ मते पडली. रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांच्या विजयाने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांचा आतषबाजीत सामंत यांची शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली.

बाळ माने यांची राजकीय कारकीर्द

भाजपाचे माजी आमदार बाळ माने हे गेले अनेक वर्षे भाजपमध्ये काम करत आहेत. बाळ माने यांनी १९९९ साली प्रथम विधानसभा निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४ अशा तीन निवडणुकांमध्ये उदय सामंत आणि बाळ माने यांनी एकमेकांविरोधात निवडणुकी लढल्या. त्यात बाळ माने यांचा सलग तीनवेळा पराभव झाला. लोकसभा निवडणुकांआधी बाळ माने सक्रिय होवून त्यांनी भाजपचा प्रचार सुरू केला. विधानसभेसाठी उमेदवारी मिळण्यासाठी बाळ माने यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले होते. यावेळी भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांकडून वारंवार रत्नागिरी मतदारसंघाची मागणी करण्यात आली. मात्र या मतदार संघातील आमदार महायुतीचाच असल्याने ही जागा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांना जाणार हे निश्चित झाले होते. त्यामुळे बाळ माने यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला व उमेदवारी मिळवली.

२०१४ व २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील स्थिती

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपा हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे गेले होते. त्यावेळी भाजपचे बाळ माने यांचा शिवसेनेच्या उदय सामंत यांनी पराभव केला होता. सामंत यांना ९३८७६ मते मिळाली होती, तर माने यांना ५४४४९ मते मिळाली होती. भाजपचे बाळ माने हे १९९९ मध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडूण गेले होते. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये उदय सामंत यांनी भाजपच्या बाळ माने यांचा सलग तीन वेळा पराभव केला.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार होते. त्यांची लढत राष्ट्रवादीचे उमेदवार सुदेश मयेकर यांच्याविरोधात झाली. या निवडणुकीत सामंत यांना ११८४८४ मते मिळाली, तर मयेकर यांना केवळ ३११४९ मते मिळाली. ८७ हजारांहून अधिक मताधिक्याने सामंत विधानसभेवर निवडूण गेले.

हेही वाचा : Kopari Pachpakhadi Vidhan Sabha Constituency : एकनाथ शिंदेंविरोधात कोण लढणार? मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात महासंग्राम रंगणार!

हेही वाचा : Sharad Pawar : शरद पवारांची महायुतीवर टीका, “पुण्याचं वैशिष्ट्य विचारलं की लोक म्हणतात कोयता गँग”

रत्नागिरीची भौगोलिक स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणात आहे. पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे. उत्तरेकडे रायगड जिल्हा आहे. तर पूर्वेकडे सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे आहेत. दक्षिणेला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. आंबा, नारळ, फणस, सुपारी, भात, नाचणी ही प्रमुख पिके रत्नागिरीत घेतली जातात.

Story img Loader