मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. पावसाळ्या आधी होणाऱ्या नालेसफाई कामाची झाडाझडती घेण्यास भाजपाने सुरुवात केली आहे. त्यानंतर राजकारणाला ऊत आला आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेतला. तसेच पावसाळ्यासाठी मुंबई महापालिका तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबईतील कामांबाबत माहिती दिली. पत्रकारांनी आशिष शेलार यांनी केलेल्या ट्वीटबद्दल त्यांना सांगितलं असता. त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. टीका सोडून जर चांगल्या सूचना दिल्या तर आणि त्यावर विचार करू असा टोलाही त्यांनी लगावला.”मी टीका करणाऱ्यांकडे लक्ष देत नाही. मी त्यांना उत्तर देऊ इच्छित नाही. टीका, आरोप होत असतात. पण या व्यतिरिक्त त्यांना काही चांगलं सुचलं आणि त्यांनी सूचना दिली तर नक्कीच आम्ही विचार करु.” अशा शब्दात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आशिष शेलार यांना टोला लगावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा