जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला होता. यावरून सकल मराठा समाजासह विरोधकांनी सरकारला घेरलं होतं. मात्र, सोमवारी ( ४ सप्टेंबर ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जखमींची माफी मागितली आहे. बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे, जखमी झालेत, त्यांची क्षमा मागतो, असं फडणवीसांनी म्हटलं. यावरून आमदार रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“माझ्या आधीच्या सत्तेच्या काळात पाच हजार आंदोलनं झाली. तेव्हा कधीच बळाचा वापर केला नव्हता. आता बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे, जे जखमी झालेत, त्यांची मी क्षमा मागतो. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोषींवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. या घटनेचं राजकारण होणं योग्य नाही. काही नेत्यांनी तो प्रयत्न केला. लाठीमाराचे आदेश मंत्रालयातून आले, असे चुकीचे वातावरण निर्माण करण्यात आले,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Aniket Tatkare
अनिकेत तटकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा ‘गद्दारांचा बादशाह’ असा उल्लेख, महायुतीत जुंपली; मंत्र्याकडून राजीनाम्याची तयारी
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
NCPs MLA from Wai Makarand Jadhav appointed as Guardian Minister of Buldhana
बुलढाणा पालकमंत्री निवडीतही धक्कातंत्र; राष्ट्रवादीची बाजी

हेही वाचा : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खोटं बोलण्यात वस्ताद! हे सारं दुतोंड्यांचं…”, जालना लाठीमार प्रकरणी ठाकरे गट आक्रमक

“…तर राजीनामा द्यावा”

यावर रोहित पवार म्हणाले, “आपल्याकडून एखादी गोष्ट झाल्यावर ती स्विकारतो आणि मग माफी मागतो. तुम्ही ती गोष्ट स्विकारत आहात. तर, त्या नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी सामान्य कार्यकर्त्यांची मागणी आहे. सरकारमध्ये असलेल्यांनी त्याचा विचारा करावा.”

हेही वाचा : “…अन्यथा सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही”, जालन्यातून बच्चू कडूंचा इशारा

“‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम बंद करावा”

दरम्यान, रोहित पवार यांनी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावरून सरकारवर टीका केली आहे. “शासन सामान्य लोकांच्या घरापर्यंत योजना पोहचवण्यासाठी असतं. पण, यांना शक्तीप्रदर्शन आणि राजकीय भाषण करायचं आहे. यासाठी सरकारच्या पैशांचा वापर केला जातोय. हा कार्यक्रम अतिशय चुकीचा आहे. लोकांना लाभ मिळत नाही. मात्र, मनस्ताप खूप होतो आहे. सरकारने हा कार्यक्रम बंद केला पाहिजे,” अशी मागणी रोहित पवारांनी केली.

Story img Loader