सध्या देशात ‘इंडिया’ आणि ‘भारत’ नावावरून मोठा गदारोळ सुरू आहे. मोदी सरकारनं पाच दिवस संसदेच विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात संविधानातील ‘इंडिया’ नाव हटवणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

“नाव बदलून प्रश्न सुटत असतील, तर हुकूमशाहीला लोकशाही म्हणायला हवं,” अशी टीका रोहित पवार यांनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवरून मोदी सरकारवर केली आहे.

Ajit Pawar, Ajit Pawar rebuked municipal commissioner,
“तुम्ही सगळं मुख्यमंत्र्यांकडे ढकलून देऊ नका”! तरुणीच्या अर्जावरुन अजित पवारांनी पालिका आयुक्तांना खडसावलं
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
rohit pawar on ajit pawar confession
Rohit Pawar : “ज्या पक्षाने कुटुंब फोडलं, त्यांना…”; अजित पवारांच्या ‘त्या’ कबुलीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया!
Balasaheb Thorat, Gulabrao Patil, Finance Minister,
महायुतीने राज्य बरबाद करण्याचे काम केले, अर्थमंत्र्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो – बाळासाहेब थोरात
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
eknath shinde, Pratap Sarnaik,
साहेब असा अंगठा दाखवून चालणार नाही, निधी द्यायलाच लागेल; आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांसमोरच निधीची मागणी
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”

रोहित पवार म्हणाले, “नाव बदलून प्रश्न सुटत असतील, तर गरिबीला श्रीमंती, बेरोजगार युवकाला नोकरीवाला, महागाईला स्वस्त, भ्रष्टाचाराला सुशासन, खराब रस्त्यांना चकाचक रस्ते, आत्महत्येला इच्छामरण, हुकूमशाहीला लोकशाही म्हणायला हवं.”

हेही वाचा : मराठवाडय़ातील मराठेही कुणबी; निजामकालीन नोंदी असलेल्यांना दाखले देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

“देशाच्या मुलभूत समस्या सोडवण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी भावनिक राजकारण करायचे. देशाचे मूळ मुद्दे चर्चेतून बाजूला सारायचे हाच एकमेव अजेंडा हे सरकार चालवत आहे. त्यामुळे महागाई ,बेरोजगारी, शिक्षण, दुष्काळ या विषयांना प्राधान्य द्यावे की नाव बदलण्याच्या चर्चेला प्राधान्य द्यावं, हे आता जनतेनेच ठरवायला हवं,” असं रोहित पवारांनी म्हटलं.

“मीडिया व सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी मूळ मुद्द्यांना बाजूला सारण्याचा सरकारच्या या जाळ्यात न अडकता मूळ मुद्द्यांवरच चर्चा करायला हवी,” अशी विनंती रोहित पवारांनी केली आहे.

हेही वाचा : “सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया, करोनाप्रमाणे संपवले पाहिजे हे विधान…”; उदयनिधी स्टॅलिनच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर

“कोणीही नाव हटवू शकत नाही”

संविधानातून नाव हटवण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हे नाव हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही. कोणीही नाव हटवू शकत नाही. सत्ताधारी लोकांना देशाशी निगडीत असलेल्या नावाची एवढी अस्वस्थता का वाटत आहे, हे मला समजत नाही,” असा टोला शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावला आहे.