जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर त्याचे राज्यभरात पडसाद उमटले होते. या हल्ल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं आंदोलन आणखी तीव्र केलं. तसेच जरांगे उपोषणाला बसलेले असताना त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळाला. परिणामी राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची आणि मागण्यांची दखल घेतली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासह लाठीहल्ल्याच्या दिवशी झालेल्या अनागोंदीनंतर ज्या नागरिकांवर, आंदोलकांवर कारवाई सुरू करण्यात आली ती थांबवण्याची, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. राज्य सरकारनेही ही मागणी मान्य केली होती. परंतु, दोन दिवसांपूर्वी अंतरवालीत तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा