लेह लडाखमधील सियाचिन ग्लेशियर या सर्वाधिक उंच बर्फाळ प्रदेशात कर्तव्यावर असताना बुलढाण्याच्या पिंपळगाव सराई गावातील रहिवासी असलेल्या अग्निवीर जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (सोमवार, २३ ऑक्टोबर) त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अक्षय लक्ष्मण गवते असं या अग्निवीराचं नाव आहे. जेमतेम २२ वर्षे वय असलेल्या जवानाने देशासाठी आपला जीव गमावला. रविवारी संध्याकाळी त्यांचं पार्थिव घेऊन येणारं विमान छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झालं. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हे पार्थिव लष्करी वाहनाने पिंपळगाव सराई येथे नेण्यात आलं.

अग्निवीर अक्षय गवते यांच्या पार्थिवावर काही वेळाने शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. अग्निवीर गवते हे ३० डिसेंबर २०२२ रोजी युनिट ६९ मैदानी रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. ‘टेलिफोन ऑपरेटर’ म्हणून सियाचिन ग्लेशियर भागात ते कर्तव्यावर होते. त्यांनी सैन्यात ९ महिने २१ दिवस सेवा दिली.

controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
readers feedback on loksatta editorial
लोकमानस :ही तर भारतासाठी नामुष्कीच!
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”

दरम्यान, अक्षय गवते हे अग्निवीर असल्याने त्यांना कोणतीही पेन्शन मिळणार नाही. तसेच कुठलेही सरकार लाभ मिळणार नाहीत. त्यामुळे अग्निवीर या सरकारी योजनेवर टीका होत आहे. अक्षय गवतेंच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

हे ही वाचा >> जुनी पेन्शन योजना लागू करणार; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आश्वासन

रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, जगातील सर्वांत ऊंच युद्धभूमी असलेल्या सियाचिनमध्ये देशाचं रक्षण करणारा महाराष्ट्राचा सुपूत्र ‘अग्निवीर’ अक्षय लक्ष्मण गवते हा शहीद झाला. देशरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली! दुर्दैवाची बाब म्हणजे अग्निवीर असल्याने देशासाठी बलिदान देऊनही गवते यास ना पेन्शन मिळणार, ना इतर सरकारी लाभ मिळणार. पंजाबमधील एक अग्निवीर शहीद झाल्यानंतर त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नसल्याचा अनुभव आपण नुकताच घेतलाय. ‘अग्निवीर’ ही देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांची अवहेलना करणारी योजना असल्याने त्यांचा सन्मान राखण्यासाठी आपण सर्वांनीच या योजनेला कडाडून विरोध करायला पाहीजे.

Story img Loader