शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चां रंगली आहे. तर, पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढू, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावर आमदार सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत आपले नेते आहेत. कुठेही लढले तरी स्वागतार्ह आहे, असं सचिन अहिर यांनी म्हटलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

सचिन अहिर म्हणाले, “संजय राऊत आपले नेते आहेत. कुठेही लढले तरी स्वागतार्ह आहे. पण, अनेक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, मीही विधानसभा निवडणूक लढवावी. मात्र, मला विधानपरिषद आमदारांच्या जीवावर मिळाली आहे. तशाचप्रकारे लोकसभा शाबूत ठेवणं राजकीयदृष्ट्या गरजेचं आहे. मला वाटत नाही, संजय राऊत निवडणूक लढतील.”

raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार

“संजय राऊत राज्याचे नेते”

“ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना जिल्हासंघटक म्हणून संजय राऊत, सुनील राऊत आणि रमेश कोरगावकर यांच्या मान्यतेनं जबाबदारी देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. संजय राऊत राज्याचे नेते आहेत. एकाच मतदारसंघात अडकून राहायचं की नाही, हा त्यांचा निर्णय आहे,” असं सचिन अहिर यांनी सांगितलं.

हेही वाचा : “…त्याशिवाय भाजपा आम्हाला जवळ ठेवणार नाही”, महादेव जानकरांचं वक्तव्य चर्चेत

“…तर विधानसभेला राष्ट्रवादीला त्याची परतफेड करावी लागणार”

“बारामती, मावळ, शिरूर आणि पुणे या चारही लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली. लोकसभेला राष्ट्रवादीचा ताकद द्यायची असेल, तर विधानसभेला राष्ट्रवादीला त्याची परतफेड करावी लागणार. अजित पवारांबरोबर काही आमदार गेल्याने तेथील मतदारसंघावर आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे,” अशी अपेक्षा सचिन अहिर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : “काहीजणांचा आव मोठा होता, पण…”, उद्धव ठाकरेंचा शिंदेसह अजित पवारांवर हल्लाबोल

“कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र”

“आपण जागा मागतोय, पण आमची खरोखरच मतदारसंघात ताकद आहे का? संभाव्य उमेदवार कोण आहे? पक्षसंघटनेची आजची स्थिती काय? याचा आढावा घेतल्यानंतर अंतिम निर्णय होईल. पण, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. लोकसभेला बारामती, शिरूर, पुण्यात किंवा अन्य ठिकाणी प्रचार करून. मात्र, तसाच न्याय विधानसभेला काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला द्यायला हवा,” असं मत सचिन अहिर यांनी व्यक्त केलं.

Story img Loader