मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो, पण देशातील कोणताही सच्चा मुसलमान कधीही ‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही, मग मला देशातून बाहेर काढले तरी चालेल असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी केले. अबू आझमींच्या विधानावर शिवसेनेने प्रत्युत्तर दिले असून ‘वंदे मातरम्’ला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे असे दिवाकर रावतेंनी म्हटले आहे.

मद्रास हायकोर्टाने दोन दिवसांपूर्वी प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये ‘वंदे मातरम्’ म्हणणे बंधनकारक केले होते. या निर्णयावरुन आता राजकारण सुरु झाले असून अबू आझमी यांनी बेताल विधान करुन नवीन वादाला तोंड फोडले. आम्हाला देशातून बाहेर काढले तरी चालेल, पण देशातील खरा मुसलमान कधीच ‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही. माझा धर्म मला ‘वंदे मातरम्’ म्हणण्याची परवानगी देत नाही. मग माझ्यावर कारवाई करा किंवा तुरुंगात टाका असे आव्हानच आझमींनी दिले.

kachya papayachi sukhi bhaji recipe in marathi bhaji recipe
कच्ची पपई खाल्याने आरोग्याला होतील चमत्कारी फायदे; कच्च्या पपईची भाजी गृहिणींनो एकदा नक्की ट्राय करा
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Shukra Gochar 2024
दिवाळीनंतर शुक्र करणार धनु राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशींचे चमकणार नशीब; धनलाभासह मिळू शकते नवी नोकरी
sago barfi for fasting
उपवासासाठी खास साबुदाण्याची बर्फी; एकदम सोपी रेसिपी
digital arrest, savings account leasing, savings account,
आपले बचत खाते भाड्याने देणे
film on Nathuram Godse called 'Why I Killed Gandhi', Gandhi and Godse discussion started again
गोडसेनं गांधींना का मारलं?
Man putting hand inside crocodiles mouth crocodile shocking video
VIDEO: “कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, तरुणानं मगरीबरोबर केलेलं कृत्य पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?
Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!

एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनीही ‘वंदे मातरम्’च्या सक्तीला विरोध दर्शवला होता. माझा धर्म, कायदा आणि संविधान मला याची परवानगी देत नाही. माझ्या गळ्यावर कोणी चाकू ठेवला तरी मी ‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही. सक्तीचा प्रयत्न झाला तर आम्ही त्याला विरोध करु असे पठाण यांनी म्हटले होते.

अबू आझमी आणि वारिस पठाण यांच्यानंतर शिवसेनेनेही या वादात उडी घेतली. गळ्यावर चाकू ठेवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. पण जर एवढी लाज वाटत असेल तर त्यांनी देश सोडून जायला पाहिजे. ही आमची मातृभूमी असून या भूमीला स्वतंत्र करणारे ते गीत आहे. या गीताचा आदर करण्याचा त्रास असल्यास तुम्ही इथून निघून जाव असे दिवाकर रावतेंनी म्हटले आहे. ही मंडळी इथे राहतात, पण मनाने पाकिस्तानी आहेत असे रावतेंनी म्हटले आहे.