सांगली : सांगलीचे तपमान ४१ अंशावर पोहचल्याने निवडणूक प्रचाराबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावरही परिणाम झाला आहे. उन्हाच्या त्रासामुळे दुपारी बारानंतर बाजारपेठा आणि रस्ते ओस पडत असून निवडणुक प्रचारालाही गतीरोधक लागत आहे.

गेल्या दोन दिवसापासून तपमान सातत्याने वाढत असून सोमवारी तापमापकामध्ये ४० अंश तपमान नोंदले गेले असले तरी प्रत्यक्षात ४१ अंश तपमान भासत आहे. आज हवेतील आर्द्रता २९ टक्के असून अंशत: ढगाळ हवामान होते. दुपारी चार वाजता सर्वाधिक म्हणजे ४० सेल्सियस तपमान नोंदले गेले. सायंकाळी सहा वाजता केवळ दोन अशांने तपमान कमी झाले असले तरी हवेतील उकाडा कायम होता. डांबरी रस्ते, सिंमेंटच्या इमारती तापल्यामुळे ही उष्णता अधिकच भासत होती. यामुळे बाजारात दुकाने दुपारनंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंदच होती.

Chronology Mathematics of time Republic Day independence day
काळाचे गणित: दिवस क्रमांक २४६०७०७
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
Rashtriya Swayamsevak Sanghs Virat shakha Darshan in Latur on Sunday
रा. स्व. संघाचे लातूरात रविवारी विराट शाखा दर्शन
Vidyut Jammwal
Vidyut Jammwal : “दररोज पाच मिनिटे श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करणे हे १० किलोमीटर धावण्याइतके फायदेशीर” अभिनेता विद्युत जामवालचा दावा; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
weather department expressed possibility of increasing heat in Mumbai for next one or two days
मुंबईत उकाडा वाढण्याची शक्यता
Temperature drop in Mumbai, Temperature ,
मुंबईच्या तापमानात घट

हेही वाचा…मविआच्या एकसंघपणामुळे विजय निश्चित – चंद्रहार पाटील

वाढत्या उन्हाच्या झळांचा निवडणूक प्रचारावर आणि शेती कामावर परिणाम झाला आहे. प्रचारासाठी घराबाहेर पडलेले कार्यकर्ते दुपारच्या रखात रस्त्याकडेला झाडाखाली विश्रांती घेत असल्याचे चित्र दिसत होते. तसेच शेतीकामाच्या वेळाही बदलल्या असून सकाळी सात ते दहा आणि दुपारी चार ते सात अशा वेळा मजुरांनी निश्‍चित केल्या असून जिरायतीमधील कामे संपली असली तरी द्राक्ष बागामध्ये एप्रिल छाटणीनंतरची विरळणीची कामे सध्या सुरू आहेत. ही कामेदोन टप्प्यात केली जात आहेत.

Story img Loader