Sanjay Gaikwad : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनंतर राज्यातील इतर भागातून अशाच प्रकराची प्रकरणं पुढे येईल लागली आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. याप्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी द्या, अशी मागणी पुढे येईल लागली आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. राज्य सरकार कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरलं असून आरोपींना कायद्याचा धाक उरला नाही असा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे.

बदलापूर प्रकरण आणि विरोधकांच्या आरोपांवर आता शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनीही भाष्य केलं आहे. अशा प्रकारच्या घटना घडत असतात, मग आता काय मुख्यमंत्री राज्यातील शाळांमध्ये जाऊन पहारा देतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय चर्चाही सुरू झाल्या आहेत. मुंबई तक या वृत्तावाहिनीला त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

Aniket Tatkare
अनिकेत तटकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा ‘गद्दारांचा बादशाह’ असा उल्लेख, महायुतीत जुंपली; मंत्र्याकडून राजीनाम्याची तयारी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Jitendra Awhad on Badlapur case akshay shinde
“अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही”, बदलापूर प्रकरणातील आरोपीबाबत जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा!
resident , feeding stray dogs, stray dogs,
भटक्या श्वानांना खायला घालण्यापासून रहिवाशाला रोखू नका, उच्च न्यायालयाचे नवी मुंबईस्थित गृहनिर्माण संस्थेला आदेश
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
DCM Eknath Shinde On Guardian Minister
Eknath Shinde : पालकमंत्रिपदाच्या वाटपानंतर महायुतीत वाद? एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर आम्ही…”
Badlapur Sexual Assault Case, Akshay Shinde Encounter Case, Akshay Shinde ,
भाजपच्या सांगण्यावरून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, माजी गृहमंत्र्यांचा थेट आरोप
sanjay raut
Sanjay Raut : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया, “राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी…”

हेही वाचा – “आता तिथे १०० फूटांचा पुतळा…”, २८ फुटांचा पुतळा कोसळल्यानंतर दीपक केसरकर यांचे विधान

नेमकं काय म्हणाले संजय गायकवाड?

“बदलापूरची घटना दुर्दैवी आहे. हा गुन्हा करणारी एक विकृती आहे. पण विरोधक या घटनेवरून राजकारण करत आहेत. विरोधातले सगळे पक्ष या मुद्द्यावरून थयथयाट करत आहेत. या घटनेला सरकारला जबाबदार धरत आहेत. पण आता काय मुख्यमंत्री राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये जाऊन पहारा देणार आहेत का? की पोलीस अधिक्षक त्यांच्या घरी जाऊन बसणार आहेत? आरोपी गुन्हा करण्यापूर्वी पोलिसांना फोन करून सांगतो का?” अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे.

“विरोधक कुठलीही घटनेचं राजकारण करतात”

“मुळात अशा प्रकाराच्या घटना घडत असतात, त्या हाताळ्यासाठी एक व्यवस्था असते, राज्यात पोलीस यंत्रणा आहे. पोलिसांकडून असे प्रकरणं हाताळल्या जात नसेल तर ती सीबीआयकडे सोपवली जातात. पण आरोपीला सोडलं जात नाही. पण अशा घटनांचं राजकारण करण्यापेक्षा नराधमांना शिक्षा कशी मिळेल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. पण असे प्रयत्न होताना दिसत नाही. विरोधक कुठलीही घटना घडली की त्याचं राजकारण करतात”, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – Statue Collapse : “पंतप्रधान हात लावतात तिथे माती होते”, पुतळा कोसळल्यावरून संजय राऊतांची टीका; म्हणाले, “शिंदेंनी मर्जीतल्या…”

बदलापूरची घटना काय?

काही दिवसांपूर्वीच बदलापूरच्या एका शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचा केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आरोपीला शिक्षा व्हावी, यासाठी बदलापूरमधील नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, या घटनेतील आरोपीला आता अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार असून आरोपीला कठोर शिक्षा दिली जाईल, असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं आहे.

Story img Loader