मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालणार नाही. हे सूर्यप्रकाशइतके स्वच्छ झालं आहे. तसेच, मिझोरामध्ये प्रादेशिक नॅशनल फ्रंट आणि अन्य पक्षांत लढाई आहे. या लढाईत काँग्रेसचं अस्तित्व आहे. पण, मिझोराममध्ये कुठल्याही परिस्थितीत भाजपाचा विजय होणार नाही, असा हल्लाबोल शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले, “तेलंगणात भाजपा स्पर्धेत नाही. भाजपाने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून के. चंद्रशेखर राव आणि एमआयएमला मतदान करण्यासाठी मतदारांना संदेश दिला आहे. पण, काँग्रेसला मतदान करू नये, असंही सांगण्यात आलं आहे. तेलंगणात भाजपाने ही रणनिती आखली आहे. मात्र, तेलंगणात काँग्रेसने मुसंडी मारली असून चांगला निकाल समोर येऊ शकतो.”

What Pawan Kalyan Said?
Pawan Kalyan : ‘सनातन धर्मा’च्या रक्षणासाठी केंद्रीय कायदा हवा’, आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची मागणी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Rahul Gandhi
“सत्तेत आल्यानंतर सर्वांत आधी…”, जम्मू काश्मीरच्या नागरिकांना राहुल गांधींचं आश्वासन
nana Patole devendra fadnavis (1)
Nana Patole : “… तर विरोधकही त्या एन्काऊंटरचं समर्थन करतील”, नाना पटोलेंचं राज्य सरकारला थेट आव्हान!
aimim tiranga yatra marathi news
‘एमआयएम’ कडून मुस्लीम मतपेढीला साद
Chandrababu Naidu
Tirupati Laddu Row : “लाडूविषयी मी बोलावं अशी देवाचीच इच्छा असेल”, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं विधान चर्चेत!
Who is BJP face for Delhi poll campaign Smriti Irani
Smriti Irani for Delhi CM: अमेठीत पराभव आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार, भाजपा दिल्लीची सूत्रे स्मृती इराणींच्या हाती देणार?
Jammu and Kashmir state status marathi news,
“जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यास कटीबद्ध”, श्रीनगरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

“गेहलोतांनी पंतप्रधानांना आव्हान दिलं आहे”

“छत्तीसगड, मध्य प्रदेशात भाजपाचा पराभव होत आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत ‘जादूगर’ आहेत. गेहलोतांनी देशाच्या पंतप्रधानांना आव्हान दिलं आहे. पाच वर्षानंतर राजस्थानात एखादं सरकार पुन्हा येत नाही. तिथे अटीतटीची लढाई आहे. तरीही राजस्थानमध्ये काँग्रेस बाजी मारणार आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधींनी पाच राज्यांमध्ये रान पेटवलं आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

“२०१४ पासून काश्मीरी पंडितांच्या मुद्दयावरून भाजपा मते मागत आहे, पण…”

“भाजपा विकासाच्या कामावर मते का मागत नाही? प्रभू श्री रामाचे दर्शन मोफत दाखवण्यापेक्षा काश्मीरी पंडितांची घरवापसी केली असती, तर नक्कीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मागण्याचा अधिकार भाजपाला होता. २०१४ पासून काश्मीरी पंडितांच्या मुद्दयावरून भाजपा मते मागत आहे. पण, पुलवामात ४० जवानांची हत्या सरकारच्या निष्काळजीपणामुळे झाली आहे. त्यामुळे भाजपाला मते मागण्याचा अधिकार नाही,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

“…तर भाजपाची मान्यता रद्द केली पाहिजे”

“प्रभू श्री रामाचे मोफत दर्शन हा आचारसंहितेचा भंग आहे. निवडणूक आयोगाने भाजपाला नोटीस बजावत पक्षाची मान्यता रद्द केली पाहिजे,” अशी मागणीही संजय राऊतांनी केली.