बारसूतील आंदोलक महिला, तरुण, वृद्धांवर लाठीचार्ज करत अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकारी खोटी माहिती देत, तेथे काही झालंच नाही, असं सांगतात. एकतर मुख्यमंत्री डोळेझाक करत आहेत किंवा त्यांची प्रशासनावर पकड नाही. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देत असतील, तर त्यांना बदललं पाहिजे, अशी मागणी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“देवेंद्र फडणवीस परदेशातून आंदोलकांना फरफटत बाहेर काढा, बळाचा वापर करण्याचे आदेश देतात. बारसूतील आंदोलकांनी प्राण गेला, तरी चालेल, पण आम्ही जमीन न सोडण्याची भूमिका घेतली आहे. सरकारने आंदोलकांशी चर्चा करणं गरजेचं आहे. मात्र, सरकार अमानूष पद्धतीने वागत आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Siddharth Jadhav
Video : सिद्धार्थ जाधवने ‘आई मला नेसव शालू नवा’ लावणीवर धरला ठेका; ‘तू ही रे माझा मितवा’फेम अभिनेत्याने दिली साथ, पाहा व्हिडीओ
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, “रुसू बाई रुसू नाहीतर गावात बसू, अशी…”
harry potter look alike
Maha Kumbh 2025: हातात पत्रावळी घेऊन प्रसादावर ताव मारताना दिसला हॅरी पॉटर? काय आहे Viral Videoचे सत्य?
Saamana critiques Shiv Sena leadership on Balasaheb Thackeray’s birth anniversary, targeting the Shinde faction.
“शिवसेनारूपी कवचकुंडले मोडून ती तोतया शिंदेंच्या हाती सोपवली”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ठाकरे गटाची टीका

हेही वाचा : “माझ्या सासुरवाडीचं फारच प्रेम उतू चाललंय, पण…”, ‘भावी मुख्यमंत्री’ बॅनर लावणाऱ्यांना अजित पवारांनी खडसावलं

“बारसू प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात समन्वय नाही. बारसूत सौदी अरेबियातील इस्लामिक ऑईल रिफायनरी कंपनी येणार आहे. त्या इस्लामिक ऑईल कंपनीसाठी रत्नागिरीतील मराठी माणसांवर बेदम हल्ले करण्यात येत आहेत. हे त्यांचं हिंदुत्व आहे,” असा हल्लाबोल संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

हेही वाचा : Video: “गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाहीतर…”, अजित पवारांची पुण्यात तुफान फटकेबाजी

‘बारसू प्रकरणी ठाकरे गटात मतमतांतर आहे,’ अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. त्याबद्दल विचारल्यावर संजय राऊतांनी सांगितलं, “आमच्यात कोणतंही मतमतांतर नाही. उद्धव ठाकरेंचा आदेश आल्यावर आमच्यातील मतमतांतर संपवून टाकतो. बारसू प्रकरणात उद्धव ठाकरेंची जी भूमिका आहे, तीच पक्षाची असेल. आमदार, खासदार आणि पदाधिकारी पक्षाच्या निर्णयाला बांधील आहेत,” असेही संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

Story img Loader