ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरूनच त्यांना कर्नाटकमधील कन्नड वेदिका या संघटनेकडून महाराष्ट्रात येऊन हल्ला करण्याची धमकी आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तसेच यावर भाजपा काही बोलणार आहे की थंडपणे पाहणार आहे? असा सवाल केला. ते गुरुवारी (८ डिसेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “कन्नड वेदिका संघटनेने महाराष्ट्रात येऊन माझ्यावर हल्ला करण्याची धमकी दिली. हा माझ्यावरील हल्ला नसेल, हा महाराष्ट्रावरील हल्ला असेल. यावर भाजपा काही बोलणार आहे का की थंडपणे पाहणार आहे? शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन तिकडल्या संघटना धमक्या देतात, हल्ले करू सांगतात यावर भाजपाने बोलावं.”

Sanjay Raut Answer to Sanjay Shirsat
Shivsena : शिवसेनेचे दोन संजय, रेड्याची शिंगं, कुंभमेळा चेंगराचेंगरी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
Chhatrapati sambhajinagar loksatta news
सिल्लोड भाजप शहराध्यक्षांसह तिघांविरुद्धचा गुन्हा रद्द, माजीमंत्री अब्दुल सत्तारांविरुद्धचे वक्तव्य प्रकरण
Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह
Panvel Marathi Conflict
Panvel Marathi Conflict : “मराठी माणसाची हिरानंदानीमध्ये राहायची लायकी नाही”, पनवेलमध्ये मराठी कुटुंबाला घर रिकामी करण्यास दबाव; मनसेकडून खळखट्याक!
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”

“आम्ही कोणासाठी भांडत आहोत?”

“राजकारण बाजूला ठेऊ. आम्ही कोणासाठी भांडत आहोत? आम्ही राज्यासाठी भांडत आहोत. यांना दोन शब्द वापरले तर त्यांचा तिळपापड होतो. त्यांनी कृती करून दाखवावी. ते सत्तेवर आहेत. भाजपा नेते बेळगावात गेले नाहीत किंवा जाणार आहात की नाही याच्याशी आम्हाला संबंध जोडायचा नाही, मात्र ते जाऊ शकत होते,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

“भाजपा नेत्यांच्या मनगटात खरंच महाराष्ट्राचं रक्त असतं, तर त्यांनी…”

“कर्नाटकचे लोक जतमध्ये घुसतात, मुंबईत घुसतात आणि हे थंडपणे सर्व पाहत आहेत, मग आम्ही कोणत्या शब्दाने भाजपाचं कौतुक करायचं? ते माझी पत्रकार परिषद होऊ देणार नाही म्हणतात. भाजपा आणि शिंदे गटाचे नेते आज जी भाषा बोलत आहेत ती कन्नड वेदिकावाल्यांचीच आहे. जर यांच्या मनगटात खरंच महाराष्ट्राचं रक्त असतं, तर त्यांनी या मुद्द्यावर शिवसेनेला पाठिंबा दिला असता,” असं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर सडकून टीका केली.

हेही वाचा : “दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा, असं…”, भाजपा आणि आपबाबत संजय राऊत यांचं वक्तव्य

“माझी पत्रकार परिषद होऊ देणार नाही अशी धमकी देण्यात आली. मात्र, माझी पत्रकार परिषद सुरू आहे. भडकावण्याची भाषा कोण करत आहे? देशात आणि महाराष्ट्रात शिवसेनेने कधीही कोणाला भडकावलेलं नाही,” असंही राऊतांनी नमूद केलं.

Story img Loader