राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (दि. २ जुलै) लोकसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा उल्लेख बालबुद्धी असा केला. या उल्लेखावरून आता विरोधक पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत. शिवसेना उबाठा गटाच्या संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना यावर भाष्य केले. “नरेंद्र मोदी यांनी बहुमत गमावलं आहे. ४०० पार म्हणता म्हणता ते जेमतेम २०० पार गेले. याला राहुल गांधी जबाबदार आहेत. तेच राहुल गांधी पंतप्रधानांसमोर विरोधी पक्षनेते म्हणून बसले आहेत. त्यांना बहुतेक हे सहन होत नसावे. कारण मोदींच्या हुकूमशाहीवर विरोधी पक्षाचा दबाव आहे. विरोधी पक्षनेत्याच्या पदाला घटनात्मक आधार आहे. त्या पदवरील व्यक्तिला पंतप्रधान बालबुद्धी म्हणत असतील तर तो व्यक्तिचा अपमान नसून संविधानाचा अपमान आहे. म्हणून आम्ही संविधान धोक्यात आहे, असे म्हणतो. मोदी संविधान, घटना मानायला तयार नाहीत. याच बालबुद्धीच्या नेत्याने तुम्हाला घाम फोडला आणि याच बालबुद्धीच्या नेत्यामुळे तुम्हाला बहुमत गमवावं लागलं”, अशी टीका शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.

संजय राऊत पुढे म्हणाले, “याच बालबुद्धीच्या नेत्याने पहिल्याच भाषणात तुमचा बुरखा फाडला. याची अस्वस्थता सत्ताधारी पक्षात आहे. विरोधी पक्षनेत्याच्या पाठीशी २३४ खासदारांचे बळ असताना तुम्ही त्यांना संसदेत अशाप्रकारे अपमानित करू शकत नाहीत. यावरून तुमची संस्कृती दिसून येते.”

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Sudha murthy rajyasabha speech in marathi
Sudha Murthy in Rajyasabha : राज्यसभेतील सुधा मूर्तींच्या पहिल्याच भाषणाची तुफान चर्चा, ‘या’ दोन मागण्यांकडे लक्ष वेधल्याने सोशल मीडियावर कौतुक!
Modi in rajyasabha
Rajyasabha : मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग; सभापती खंत व्यक्त करीत म्हणाले, “विरोधक सभागृह सोडून नाहीत, मर्यादा…”
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Milind Narvekar, Legislative Council,
मिलिंद नार्वेकर ‘खेळ’ करणार ?
IT hub, Satara Shirwal,
सातारा शिरवळ येथे आयटी हब, तर पुसेगाव रस्त्यालगत औद्योगिक वसाहत – उदय सामंत
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…

Live : अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिकांची हजेरी, महायुतीत पुन्हा ठिणगी?

तर अटल बिहारी वाजपेयींनीही आणीबाणी लादली असती

राज्यसभेत बोलत असताना संजय राऊत यांचा माईक बंद करण्यात आला होता. यावर भाष्य करताना ते म्हणाले की, लोकसभेमध्ये भाजपाने काही जागा कशा चोरल्या, हे मी सांगत असताना माझा माईक बंद करण्यात आला. भाजपाकडून सारखं सारखं आणीबाणीचा विषय काढण्यात येत आहे. मला यावरच बोलायचे होते. ५० वर्षांपूर्वी झालेल्या आणीबाणीचा विषय आणखी किती वर्ष उगाळत बसणार आहात? दिल्लीच्या रामलीला मैदानावरून लष्कराने बंड करावे, असे आवाहन केले गेले होते. या आवाहनानंतर देशात अराजक माजेल, अशी भीती निर्माण झाली होती. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्याजागी अटल बिहारी वाजपेयी असते तरी त्यांनीही आणीबाणी लादली असती, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

हाथरससारखी घटना नवी मुंबईतही घडली

हाथरसमध्ये सत्संगदरम्यान चेंगराचेंगरी होऊन १२१ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल बोलत असताना संजय राऊत म्हणाले की, हाथरससारखं प्रकरण नवी मुंबईतही घडलं होतं. अमित शाह यांच्या समोरच चेंगराचेंगरी होऊन काही लोक मृत्यूमुखी पडले होते. अशाप्रकारच्या सत्संगावर बंदी आणली पाहीजे, कुणासाठी हे सत्संग भरविले जात आहेत. याची जबाबदारी राज्य सराकरवर टाकली पाहीजे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.