भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असं विधान फडणवीसांनी केलं. ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी अनेक खुलासे केले आहेत.

पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. या सर्व घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार अशाप्रकारे धोकेबाज राजकारण करणार नाहीत. मी त्यांना चांगल्याप्रकारे ओळखतो,” असं संजय राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी नैराश्यातून हे विधान केलं असावं, असंही ते म्हणाले.

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Sanjay Raut On Congress Arvind Kejriwal
Sanjay Raut : “अरविंद केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर…”, संजय राऊतांचं मोठं विधान
chief minister fadnavis criticized legislature for neglecting lawmaking and economic development tasks
विधीमंडळाच्या कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…!
Devendra Fadnavis on Beed Politics
देवेंद्र फडणवीसांचे ‘नवीन बीड’चे आवाहन धनंजय मुंडेंसाठी आणखी एक धक्का आहे का?
devendra fadnavis on political extortion
Devendra Fadnavis Exclusive: “काही मध्यम स्तरावरचे नेते हे धंदे करत होते, पण…”, पॉलिटिकल एक्स्टॉर्शनबाबत फडणवीसांची सडेतोड भूमिका!
Devendra Fadnavis Exclusive
Devendra Fadnavis : “कामाच्या नुसत्या घोषणा नाही, १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देणार”, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली योजना
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”

फडणवीसांच्या गौप्यस्फोटाबद्दल विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “मला असं वाटत नाही की, शरद पवारांशी चर्चा करून पहाटेचा शपथविधी घेतला. मी शरद पवारांना जास्त ओळखतो. शरद पवार असं धोकेबाज राजकारण करणार नाहीत. पण फडणवीसांनी हे विधान नैराश्यातून केलं आहे.”

हेही वाचा- ‘अजितदादा बोलले तर मी आणखी गौप्यस्फोट करेन’, पहाटेच्या शपथविधीवरुन फडणवीसांचा इशारा

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९ विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सत्तास्थापनेसाठी चर्चा करत होते. त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती. आम्हाला स्थिर सरकार हवं आहे, असं शरद पवार म्हणाले होते. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर काही गोष्टी ठरल्या होत्या. शरद पवारांशी चर्चा केल्यानंतरच आम्ही शपथविधी घेतला होता. पण, या सर्व गोष्टी ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे.

Story img Loader