शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टमध्ये विविध नेत्यांनी हजेरी लावली आहे. यापूर्वीच्या भागात शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली होती. आता खासदार संजय राऊत यांच्या मुलाखतीचा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये निवडणुका, ईडीवर भाष्य करत संजय राऊतांनी भाजपाला इशारा दिला आहे.

प्रोमोत संजय राऊत म्हणतात, “ज्या मराठी माणसाला भिकारी, घाटी, कोकणी म्हणलं जायचं. त्या माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. मित्रपक्षाने फसवलं, म्हणून शिवसेना थांबली का? संपली का? शिवसेना म्हणजे अग्नीकुंड आहे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे.”

Ramraje Naik Nimbalkar, Satara,
सातारा : रामराजे नाईक निंबाळकर यांनी पक्षांतराचे वृत्त फेटाळले
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Maharashtra debt, Maharashtra elections,
महाराष्ट्रात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना राबविल्या जातात, त्यामुळे राज्यावर ९ लाख कोटींचे कर्ज – जयंत पाटील
Ajit Pawar On Sunil Shelke
Ajit Pawar : “प्रत्येकजण मरायला आलाय”, सुनील शेळकेंचा विरोधकांना इशारा, अजित पवारांनी भर सभेत टोचले कान; म्हणाले, “जरा…”
uddhav thackeray News
Uddhav Thackeray : “गद्दारांना ५० खोके आणि लाडक्या बहिणींना फक्त १५००?” उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल
Chiplun sharad pawar marathi news
“चिपळूणसारखे खराब रस्ते महाराष्ट्रात कुठेच नाही”, कुंभार्ली घाटातून प्रवास करताना शरद पवार यांनी व्यक्त केली नाराजी
Chhagan Bhujbal On Mahayuti
Chhagan Bhujbal : अजित पवारांनी महायुतीत किती जागा मागितल्या? छगन भुजबळांनी आकडाच सांगितला; म्हणाले…
nana patole, Vijay wadettiwar
महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद आता दिल्ली दरबारी; पटोले, धानोरकर, वडेट्टीवारांना पक्षश्रेष्ठींकडून पाचारण

“उद्धव ठाकरेंनी पक्षांचं नेतृत्व स्वीकारल्यापासून बाळासाहेबांची संघटना दोन पाऊले पुढे नेली. भाजपाने ज्यापद्धतीने आमच्याशी वर्तवणूक केली, त्याबद्दल त्यांना क्षमा नाही. महापालिका निवडणूक घेण्यास घाबरतात. लोकसभा घेतील का नाही? अशी शंका आहे,” असं संजय राऊतांनी म्हटलं.

“शंभर भ्रष्टाचारी गोळा करून आपल्या पक्षात घ्यायचे, हे कोणतं बहुमत आहे? याला बहुमत नाही, व्यापार म्हणतात. ईडी ही दहशतवादी संघटना आहे. त्यांच्या बापाचे घर असल्यासारखं ताबा घेतात. शिवसेना ही सत्तेसाठी नाहीतर महाराष्ट्र आणि जनतेच्या संघर्षांसाठी जन्माला आली आहे. शिवसेना विझली तर महाराष्ट्रातील आग संपेल”, असेही संजय राऊतांनी सांगितलं.