माझ्या नादाला लागू नका, मला आडवे आलात तर मी कोणालाही सोडत नाही.  या दाढीने जर काही काडी फिरवली तर तुमची उरली-सुरली लंकासुद्धा जळून खाक होईल, असा जाहीर इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला. त्यांच्या या इशाऱ्यावर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

“दाढी खेचून आणली असती (असं उद्धव ठाकरे म्हणाले)… ही दाढी इतकी हलकी आहे का? या दाढीने जर काही काडी फिरवली तर तुमची उरली-सुरली लंकासुद्धा जळून खाक होईल. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका. मी कोणाला आडवा जात नाही. परंतु, मला कोणी आडवा आला तर मी त्याला सोडतही नाही. कारण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची मला शिकवण मिळाली आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.

Sharad pawar on Eknath shinde (1)
Sharad Pawar : “ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी प्रयत्न केले”, शरद पवारांच्या विधानाची चर्चा; संजय राऊतही संतापले!
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Rakhi Sawant
“चूक केली; पण त्याला…”, राखी सावंतने घेतली रणवीर अलाहाबादियाची बाजू; म्हणाली…
posters praising eknath shinde as man of god displayed in front of pimpri chinchwad municipal corporation
“एकनाथ शिंदे देव माणूस”, पिंपरीत झळकले फ्लेक्स; त्यांच्या योजना बंद करू नका अशी विनंती करण्यात आली
Suresh Dhas On Jitendra Awhad
Suresh Dhas : “अक्षय शिंदेची वाहवा करणारे…”, आमदार सुरेश धस यांचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल
eknath shinde anand dighes film became super hit and our Vidhansabha picture also became super hit Now we want to make third film
खासदार फुटीच्या चर्चेवर एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी
Saif Ali Khan
“दरोड्याचा प्रयत्न फसला…”, सैफ अली खानचे हल्लेखोराबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, “त्या बिचाऱ्या…”
MLA Jitendra Awhad reaction after badlapur rape case accused akshay shindes parents withdraw the case
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, “…तर अक्षय शिंदेचे भूत तुमच्या मानगुटीवर बसणार, हे नक्की”

हेही वाचा >> “या दाढीने काडी केली तर…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “माझ्या नादाला लागू नका, अन्यथा…”

संजय राऊत काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांच्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, लंका त्यांचीच आहे. लंका रावणाची जळते. रामाला दाढी नव्हती. रावणाला दाढी होती. त्यांना रामायण-महाभारत वाचायला लागेल. या महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री मिळाले होते. यशवंतराव चव्हाणांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळे संस्कारी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री साहित्य, कला, काव्य यामध्ये रमायचे. त्यामुळे कोणाचं काय जळतंय हे लवकरच कळेल. मुळात दिल्लीचीच लंका जळतेय. तुम्ही ज्या लंकेत गेलेला आहात ती लंकाच आम्ही लोकसभा निवडणुकीत जाळणार आहोत.

या देशात हिंदुंचा पाकिस्तान होऊ देणार नाही

“या देशातील मुसलमान, ख्रिश्चन सर्व धर्मांना घाबवरलं जात आहे. हिंदू आणि अन्य धर्मांमध्ये वाद निर्माण केला जातोय. याचा देशाला धोका असून यामुळे देश तुटेल. पण महाराष्ट्रात मुस्लीम समाज आपल्याबरोबर आहे कारण, खूप मुसलमान नेता, कार्यकर्ता, गरीब-सामान्य मुसलमान आमच्याकडे येतात आणि सांगतात की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुमचं हिंदुत्त्व आमच्या घरात चूल पेटवण्याचं हिंदूत्त्व आहे. पण भाजपाचं हिंदुत्त्व आमचं घर जाळण्याचं हिंदूत्व आहे. त्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर आहोत. ही खूप मोठी गोष्ट आहे. देशात-घराघरात जात, धर्माच्या आधारावर नाही तर मानवतेच्या आधारावर रोजगार मिळाला पाहिजे हे आमचं हिंदुत्त्व आहे. रामाबरोबर कामही झालं पाहिजे. या देशात हिंदुंचा पाकिस्तान किंवा इराण होऊ देणार नाही. हा देश खूप मोठा आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.

Story img Loader