विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाविरोधात भाजपा व शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही औरंगजेबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. भाजपा व शिंदे गटाच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली जात आहे. तसेच, राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनही केली जात आहेत. भाजपा आमदार आशिष शेलार यांनीही आज ट्वीटद्वारे टीका केली. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “आशिष शेलारांनी टीका केली म्हणजे काय झालं? आशिष शेलार शंकराचार्य आहेत का देशाचे? कोण आहेत ते, हिंदुत्वावर बोलण्याचा त्यांना अधिकार काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा हिंदुत्वाचा अपमान नाही का? याचं उत्तर त्यांनी द्यावं.”

Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Devendra Fadnavis Ask Question to Sharad pawar
Devendra Fadnavis : “आपल्या बापाला लुटारु म्हणणारे हे कोण लोक आहेत?”, सूरतच्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
Rahul Gandhi criticizes Narendra Modi regarding Shivputla GST demonetisation
पंतप्रधानांनी देशवासीयांचीच माफी मागावी; शिवपुतळा, जीएसटी, नोटाबंदीचा उल्लेख करत राहुल गांधी यांचे टीकास्त्र
police issue lookout notice against sindhudurg shivaji statue artist jaydeep apte
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण; शिल्पकार जयदीप आपटे विरोधात लुकआऊट नोटीस जारी
ajit pawar
छायाचित्रांना जोडे काय मारता, हिंमत असेल तर समोर या – अजित पवार
Big boss marathi season 5 contestant suraj Chavans struggle kiratnkar maharaj tells youth about
“आयुष्यात जेव्हा आत्महत्येचा विचार येईल तेव्हा सुरज चव्हाणला आठवा” किर्तनकार महाराजांचा तरुणांना सल्ला; VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह

काय म्हणाले होते आशिष शेलार? –

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला “टकमक टोकाकडे” घेऊन जात आहेत! आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे.”

हेही वाचा – “…पण मुंबई आधी महाराष्ट्राची राजधानी आहे हे विसरू नका” मुख्यमंत्री योगींच्या दौऱ्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

“उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन चाकी सरकार आल्यापासून नियोजनबध्द कट रचलाय? म्हणूनच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणाऱ्या अजित पवार यांची आज सामनाने पाठराखण केलेय? या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून “अण्णाजी पंत” यांनी लिहीलेय?”

हेही वाचा – “आधी शिवाजी महाराजांच्या अपमानासंदर्भात…” शिंदे-फडणवीसांना उद्देशून संजय राऊतांचं विधान!

“छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते- .अजित पवार, औरंगजेब क्रूर, हिंदूद्वेष्टा नव्हता – जितेंद्र आव्हाड, दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांच्या पक्षाच्या नेत्यांची ही विधाने महाराष्ट्राने हलक्यात घ्यावी का? ही एक “औरंगजेबी” चाल तर नाही ना?”