जालन्यात आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. राजकीय वर्तुळातून या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. विरोधकांनी हे सर्व सरकारच्याच आदेशांनी घडवून आणण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दोन दिवसांत निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

केंद्र सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात घटनादुरुस्ती विधेयक आणावं, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. “तुमच्या अधिकारांसाठी किंवा लोकनियुक्त सरकारचा आवाज दाबण्यासाठी संसदेत विशेष विधेयक आणता आणि जबरदस्तीने मंजूर करून घेता. मग संसदेच्या या विशेष अधिवेशन मराठा आरक्षणासंदर्भात घटनादुरुस्ती करून तुम्ही त्यांना न्याय का देत नाही?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

kalyan dombivli municipal corporation marathi news
कल्याण डोंबिवली पालिकेतील दोन अभियंत्यांना आयुक्तांची कारणे दाखवा नोटिस, मलवाहिन्या सफाई कामातील ठेकेदाराच्या कामात त्रुटींकडे दुर्लक्ष
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Controversy over the initials Rama written on the body of a goat
बकऱ्याच्या अंगावर लिहिलेल्या राम आद्याक्षरावरून वाद; न्यायालयात नेमके काय घडले?
Abhishek Ghosalkar murder case, CBI,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, मुंबई पोलिसांच्या तपासातील त्रुटींवर उच्च न्यायालयाचे बोट
badlapur rape case marathi news
बदलापूर प्रकरणात माध्यम प्रतिनिधींचा आरोपींमध्ये समावेश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नोटीसा आल्याने संताप
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
Amruta Fadnavis
Amruta Fadnavis : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यापेक्षाही मोठा पुतळा…”
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

पोलिसांना आलेला अदृश्य फोन कुणाचा होता – संजय राऊत

मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला करण्याचे आदेश देणारा फोन कुणी केला होता? असा प्रश्नही संजय राऊतांनी केला आहे. “मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना तिथे जाण्याचं तोंड नाहीये. कारण त्यांनीच आंदोलन चिरडून टाकण्याचे आदेश दिलेत. अदृश्य फोन कुणाचा होता? मुख्यमंत्री की गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून होता? लाठीहल्ल्यात पोलिसांचा दोष नाही. तिथल्या पोलीस प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. तुम्ही यात पोलिसांचा बळी देताय. पण वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय पोलीस प्रमुख हा निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना वरून आदेश आले. आता हे वरून म्हणजे कुठून आले ही गोपनीयता पोलीस अधिकारी पाळतायत”, असं राऊत म्हणाले.

“जालन्यात उपोषण चिरडणारा जनरल डायर…”, ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल!…

“सरकारमध्ये तीन जनरल डायर”

यावेळी बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जनरल डायरची उपमा दिली आहे. “जनरल डायर कोण हे सगळ्यांना कळलंय. महाराष्ट्रात तीन तीन जनरल डायर आहेत. एक मुख्य व दोन उप जनरल डायर. जनरल डायरच्या मानसिकतेतून राज्य चालू आहे”, असं त्यांनी नमूद केलं.

“हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, किरीट सोमय्या, भावना गवळी यांना या २६ जानेवारीला बहुतेक पद्मश्री, पद्मभूषण कुणाला भारतरत्न अशा पदव्या द्यायची शिफारस चालली आहे. ब्रिटिश काळात सरकारच्या चमच्यांना रावसाहेब, रावबहादूर अशा पदव्या द्यायचे. मग त्यांनी कितीही गुन्हे केलेले असू द्या. आता भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलेल्या सगळ्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, १०-२० हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना कदाचित भारतरत्नही देतील”, असा टोलाही राऊतांनी लगावला.