मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण? हे जर देवेंद्र फडणवीसांना माहीत नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. मनोज जरांगे पाटील यांना बोलायला लावणारे तुमच्या आजूबाजूला बसले आहेत का? ज्यांना महाराष्ट्र अस्थिर करुन काही वेगळं राजकारण करायचं आहे. जरांगे पाटील यांच्याविषयी माहिती असेलच. त्यांचे फोन वगैरे टॅप करण्यासाठी रश्मी शुक्लांना बसवलं आहे. त्या अनुभवी आहेत या सगळ्याच्या बाबतीत. कोण कुणाशी बोलतंय, पाठिंबा देतंय हे रश्मी शुक्लांना माहीत असतं. त्यामुळे अनुभवी डी.जी. असलेल्या रश्मी शुक्लांशी चर्चा केली पाहिजे. फोन करणारे आपल्या सरकारमध्ये आहेत का? हे फडणवीसांनी जाणून घेतलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

तुमच्या सरकारमधले लोक काड्या लावत आहेत का? कोण जरांगेंशी बोलतं आहे हे जर देवेंद्र फडणवीसांना माहीत नसेल तर ते दुर्दैव आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
lokmanas
लोकमानस: लोकशाही की एकाधिकारशाही?
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
A youth from Bihar files a case against Rahul Gandhi seeking Rs 250 as compensation, highlighting the ongoing legal dispute.
Rahul Gandhi : “ते विधान ऐकून धक्का बसला अन् हातातून दुधाची बादली पडली”, २५० रूपयांसाठी राहुल गांधींविरोधात तरुणाची याचिका
Sanjay Raut on Devendra Fadnavis
Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस लाचार, हतबल मुख्यमंत्री; पालकमंत्रीपदाचा निर्णय बदलताच संजय राऊत यांची टीका
Indian state Rahul Gandhi
राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये एफआयआर, राजकीय स्टंट असल्याची काँग्रेसची टीका
Sanjay Raut on uday Samant
“एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच ‘उदय’ होणार होता”; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ; राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता?

मला गोळ्या घातल्या जातील, एन्काऊंट केला जाईल ही मनोज जरांगेंची भाषा त्यांनी बहुदा भाजपाकडून घेतली आहे. जरांगे हे साधे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या भाषेकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या भावना लक्षात घ्या. तुमच्याकडे जे भाजपाचे सुशिक्षित नेते, कडक इस्त्रीचे कपडे घालणारे ते काय भाषा वापरतात ते जरा बघा. एकमेकांना संपवण्याची भाषा त्यांची आहे. या राज्यात भाषेची संस्कृती आणि संस्कार कुणी बिघडवला असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाच्या नेत्यांनी बिघडवला आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राची सूत्रं गेल्यापासून महाराष्ट्रातली भाषा रसातळाला गेली आहे.

हे पण वाचा- “देवेंद्र फडणवीसांनी मला सागर बंगल्यावर बोलवलं आणि दरवाजे बंद केले, पण आता..”, मनोज जरांगेंचा इशारा

मोदींच्या स्कूबा डायव्हिंगवरही टीका

शेतकरी आंदोलन करताना मोदी डायव्हिंग करत आहेत. विकासासाठी मोदींसह गेलो असं अजित पवारांनी पत्र लिहिलं आहे. आता बहुदा अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनाही समुद्रात डुबकी मारुन स्कूबा डायव्हिंग करावं लागेल. मोदी करतील ते त्यांना करावंच लागेल. अजित पवार बहुदा धरणात उडी मारतील. असाही टोला संजय राऊत यांनी लगावला.

Story img Loader