वैद्यकीय कारणांमुळे जामीनावर तुरुंगाबाहेर आलेल्या नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवला असल्याची चर्चा चालू आहे. मलिक हे गुरुवारी (७ डिसेंबर) विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत सत्ताधारी बाकावर जाऊन बसले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा अडचणीत सापडली आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसह सत्तेत असताना फडणवीस यांच्यासह भाजपाने नवाब मलिक यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले होते. त्यानंतर मलिक यांना तुरुंगात जावं लागलं होतं. अशातच नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवून महायुतीत प्रवेश केल्याच्या चर्चेमुळे शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेसने भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक प्रकरणावर नाराजी व्यक्त करत अजित पवार यांना एक पत्रदेखील लिहिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधीमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. ज्या आरोपांखाली ते तुरुंगात गेले, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही, असं आमचं मत आहे. नवाब मलिक हे सध्या केवळ वैद्यकीय कारणांमुळे जामीन मिळून तुरुंगाबाहेर आले आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण (अजित पवार गटाने) त्यांचं स्वागत करावं. परंतु, अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं योग्य नाही.

gunratna sadavarte sharad pawar news
“एसटी कर्मचाऱ्याच्या संपात शरद पवार, उद्धव ठाकरेंची माणसं”; गुणरत्न सदावर्तेंचा आरोप; म्हणाले, “ज्या कृती समितीने…”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
Nagpur university professor sonu jeswani
भाजपमधील मोठ्या नेत्यांच्या नावाचा वापर करून डॉ. कल्पना पांडे यांची मनमानी, ‘यांनी’ केला आरोप
sushma andhare on ajit pawar
Sushma Andhare : “सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन चुकलो”, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “वरातीमागून…”
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare
“…तर १५०० परत घेऊ”, रवी राणांच्या विधानावर आदिती तटकरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “महायुतीच्या सरकारने…”
ravi rana clarification on ladki bahin
Ravi Rana : विरोधकांनी टीकेची झोड उठवताच ‘त्या’ विधानावर आमदार रवी राणा यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “मी जे बोललो…”

हे ही वाचा >> “आम्ही त्यांच्याशी कुठलीही…”, नवाब मलिकांवरून महायुतीतल्या कथित मतभेदांनंतर अजित पवार गटाचं स्पष्टीकरण; म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने या पत्रावरून फडणवीस यांना टोला लगावला आहे. ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांचं हे पत्र मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर रिपोस्ट करत म्हटलं आहे, “अरे बापरे! सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेला हे माहीतच नव्हतं. त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सिंचन घोटाळा फेम अजित पवार, ईडी फेम भावना गवळी, प्रताप सरनाईक, मुलुंडचे ना## पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे. यांचा देश हा असा आहे! हल्ला फक्त मलिक यांच्यावर, बाकीचे यांच्या मांडीवर! पिते दूध डोळे मिटूनी…जात मांजराची…”