वैद्यकीय कारणांमुळे जामीनावर तुरुंगाबाहेर आलेल्या नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवला असल्याची चर्चा चालू आहे. मलिक हे गुरुवारी (७ डिसेंबर) विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत सत्ताधारी बाकावर जाऊन बसले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा अडचणीत सापडली आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसह सत्तेत असताना फडणवीस यांच्यासह भाजपाने नवाब मलिक यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले होते. त्यानंतर मलिक यांना तुरुंगात जावं लागलं होतं. अशातच नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवून महायुतीत प्रवेश केल्याच्या चर्चेमुळे शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेसने भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक प्रकरणावर नाराजी व्यक्त करत अजित पवार यांना एक पत्रदेखील लिहिलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा