ठाकरे गटाचं आज वरळी येथे राज्यव्यापी शिबीर पार पडलं. या शिबिरातून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली. देशात, राज्यात आणि मुंबईत सत्ताधारी पक्षाकडून कशी लूट केली जात आहे, याबाबत संजय राऊतांनी टीकास्र सोडलं. यावेळी त्यांनी चारोळीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

ठाकरे गटाच्या शिबिरात भाषण देताना संजय राऊत म्हणाले, “आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण मुंबईचा ‘रोडमॅप’ आपल्यासमोर ठेवला आहे. मुंबईची कशी लुटालूट सुरू आहे, हे त्यांनी सांगितलं. होय, मुंबईची लूटच सुरू आहे. यासाठी दुसरा शब्द नाही. महाराष्ट्रात लूट… मुंबईत लूट… देशात लूट… या लुटीच्या कथा ऐकून मला दोन ओळी सुचल्या. ‘दो मस्ताने चले जिंदगी बनाने, चुना लगा के पुरा देश डुबाने'”

sanjay raut
“वंदे मातरमला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं,आता हिंदुत्त्वाचा गब्बर…”; इद्रीस नायकवाडींच्या शपथविधीवरून संजय राऊतांचं टीकास्र!
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
manoj jarange patil criticized devendra fadnavis
“आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही”, आचारसंहिता जाहीर होताच मनोज जरांगेंचा थेट इशारा; म्हणाले…
manoj jarange patil criticized devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांनी विनाकारण मराठ्यांचं वैर अंगावर घेतलं, ज्या मराठ्यांनी…”; मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल!
Sharad Pawar criticism that such rulers have not been seen in the history of the maharshtra state pune print news
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; म्हणाले, “गृहमंत्री एवढ्या सौम्यतेने…”
gang stabbed young man with koyta in dandiya event
दांडीया कार्यक्रमात टोळक्याची दहशत, तरुणावर कोयत्याने वार; सराइतासह साथीदारांविरुद्ध गुन्हा
Yati Narsinghanand
प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या यती नरसिंह आनंद सरस्वतींना अखेर पोलिसांनी घेतलं ताब्यात
Devendra Bhuyar and Ajit pawar
Ajit Pawar : मुलींबाबत देवेंद्र भुयारांनी केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी केली कानउघाडणी; म्हणाले…

हेही वाचा- “…म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंचं दुकान बंद केलं”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले…

“हे दोन मस्ताने जसे दिल्लीत आहेत, तसे महाराष्ट्रातही आहेत. ते महाराष्ट्र आणि मुंबईला लुटतायत. गेल्या दोन दिवसांपासून वृत्तपत्रात एक बातमी छापून येत आहे. खरं तर, महाराष्ट्रातील नाशिक, कर्नाटकातील बंगळुरू आणि मध्यप्रदेशातील देवास येथे भारत सरकारचे नोटा छापण्याचे कारखाने आहेत. येथील कारखान्यातून तब्बल ८८ हजार कोटी रुपयांच्या नोटा गायब झाल्या आहेत. ८८ हजार कोटी रुपयांच्या नोटांचे ट्रक गायब झाले आहेत. हे ट्रक कुठे गेले? महाराष्ट्रात जो खेळ झाला, यासाठी तर त्यांनी हे पैसे वापरले नाहीत ना? आजही तो खेळ सुरूच आहे. विविध पक्षातील नेत्यांना फोडलं जातंय,” अशा शब्दात संजय राऊतांनी टीकास्र सोडलं.