आमदार अपात्रेप्रकरणी आज ( २५ सप्टेंबर ) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेतली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निकाल राखून ठेवला आहे, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांना सूचक इशारा दिला आहे.

“विधानसभा अध्यक्षांना संविधान, घटना आणि कायदा पाळावा लागेल. आज तुम्ही त्याचं उल्लंघन केलं आहे. पण, भविष्यात सरकार बदलतात. तुम्हाला किंमत मोजावी लागणार आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
व्यक्तिवेध: एस. राधाकृष्णन
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
ulta chashma
उलटा चष्मा: कोण म्हणतं गरीब जिल्हा?
review of impact on india stock market and economy after donald trump comes to power
Money Mantra : ट्रंप यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणामुळे आपलं आयुष्य का बदलणार?
Role of government in public health
आरोग्य व्यवस्था ही सरकारचीच जबाबदारी! 

हेही वाचा : “नीलम गोऱ्हे अपात्र व्हायला पाहिजेत, कारण…”, अनिल परब यांचं विधान

संजय राऊत म्हणाले, “सगळी यंत्रणा निर्ढावलेली आहे. विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश मानायला तयार नाहीत. त्यांच्याकडे लोकशाही संदर्भात कोणती अपेक्षा ठेवायची? एका राजकीय पक्षाचे नेते आहात आणि विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलात हे मान्य. पण, शेवटी देशातले संविधान, घटना आणि कायदा तुम्हाला पाळावा लागेल.”

“आज तुम्ही त्याचं उल्लंघन केलं आहे. मात्र, भविष्यात सरकार बदलतात आणि तुम्हाला किंमत मोजावी लागणार,” असा इशारा संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांना दिला आहे.

हेही वाचा : “…तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडली पाहिजे”, भाजपाचं थेट आव्हान

आजच्या सुनावणीत काय घडलं?

संजय शिरसाट म्हणाले, “आजच्या सुनावणीत प्रत्येक पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यात प्रत्येक पक्षाकडून आपली बाजू मांडण्यात आली. ही सुनावणी कधी होणार, याचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी निकाल राखून ठेवला आहे. सुनावणी ऑनलाईन पद्धतीनं व्हावी, असं अनेकांची म्हणणं आहे. याबद्दल अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.”

Story img Loader