विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांबद्दल बोलताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण मुख्यमंत्री व्हावं.” यावेळी राऊत म्हणाले की, “अनेकजण जुगाड करून लायकी नसताना मुख्यमंत्री होतात.” राऊत यांचा रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे होता. मुख्यमंत्र्यांवरील या टीकेला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.

शिरसाट म्हणाले की, मुळात संजय राऊत हे जुगाडामुळे खासदार झाले आहेत. त्यांना खासदारकी मिळत नव्हती. तेव्हा ते एकनाथ शिंदेंच्या पाया पडत होते. राऊत शिंदेंना म्हणाले की, माझी शेवटची टर्म आहे मला यावेळी साथ द्या. नाहीतर त्याला (संजय राऊत) आम्ही कधीच पाडलं असतं. आमची मानसिकता तिच होती. परंतु त्यावेळी शिंदे साहेब म्हणाले नको, जाऊ दे यावेळी त्याला निवडून आणू. ही त्याची शेवटची टर्म आहे. त्यामुळे जुगाडामुळे खासदार झालेला हा संजय राऊत आहे.

Kiran Samant On Rajan Salvi
Kiran Samant : “…म्हणून त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला नाही”, किरण सामंत यांचा राजन साळवींबाबत मोठा दावा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Eknath Shinde on Sanjay Raut
“वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंगं…”, संजय राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती

शिरसाट एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले की, त्यावेळी दोन संजय निवडणुकीला उभे होते. दुसरा संजय निवडून आला पाहिजे होता हे आमचं प्रामाणिक मत होतं. परंतु ‘मातोश्री’ने या संजय राऊतला प्राथमिकता दिली. त्यामुळे संजय राऊत हा अर्ध्या मताने निवडून आला. अर्ध्या डोक्याचा माणूस अर्ध्या मतावर निवडून आला.

Story img Loader