Suresh Dhas in Beed Morcha: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये विविध पक्षाच्या आणि संघटनांच्या लोकांनी भाषण करत असताना राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि संशयित आरोपींवर जोरदार टीका केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी भाजपाचे आमदार सुरेश धस हे पहिल्या दिवसांपासून आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. आजही त्यांनी आपल्या भाषणातून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची करुण कहानी सांगत असताना करुणा धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला. कालच त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे वाद उद्भवला होता.

हे वाचा >> Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी केलं स्पष्ट; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…

Rakhi Sawant
“चूक केली; पण त्याला…”, राखी सावंतने घेतली रणवीर अलाहाबादियाची बाजू; म्हणाली…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Suresh Dhas On Jitendra Awhad
Suresh Dhas : “अक्षय शिंदेची वाहवा करणारे…”, आमदार सुरेश धस यांचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल
Narendra Modi target arvind Kejriwal in lok sabha speech
निधीचा वापर देशासाठीच! पंतप्रधानांचे लोकसभेत प्रत्युत्तर; केजरीवाल यांच्यावर टीका
MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार झालेला कृष्णा आंधळे कोण? सुरेश धस यांनी दिली महत्त्वाची माहिती

करुणाचे खूप हाल झाले

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड हेदेखील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असल्याचे विधान मोर्चामधील अनेक नेत्यांनी केले. सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांची जिल्ह्यात दहशत असून खंडणी उकळण्याचे आणि ती त्यांच्या आकापर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप केला. यावेळी ते म्हणाले, “ही आमच्या बीड जिल्ह्याची करुण कहाणी आहे. मी करुणा कहाणी नाही म्हणत नाही. तिची तर कहाणी वेगळीच आहे. मी फक्त करुण कहाणी म्हणतोय. करुणा तर माझी माय माऊली पहिली बायको आहे. तिचे खूप हाल चालले आहेत. मला याबाबत अधिकचे काही बोलायचे नाही.”

हे वाचा >> Bajrang Sonwane : “संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर…”, बजरंग सोनवणे यांचा मोठा इशारा

धनंजय मुंडेंचे मंत्रीपद काढून घ्या

सर्वपक्षीय मोर्चात धनंजय मुंडे यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंकेही सामील झाले होते. संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आणि आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत मुंडेंचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणी प्रकाश सोळंके यांनी केली. गेल्या पाच वर्षांत धनंजय मुंडे हेच पालकमंत्री होते. तेव्हा पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पद भाड्याने दिले. ते वाल्मिक कराड यांनाच भाड्याने दिले होते. त्यांनी या माध्यमातून बीड जिल्ह्यात जरब बसविली, असाही आरोप प्रकाश सोळंके यांनी केला.

Story img Loader