सर्व शिक्षा अभियानाच्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त लिखाण असल्याचे वृत्त ताजे असतानाच आता सर्व शिक्षा अभियानाच्या दुसऱ्या पुस्तकात तुकाराम महारांजाबाबत आक्षेपार्ह उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. ‘संतांचे जीवन प्रसंग’ या पुस्तकात तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त उल्लेख असल्याची बाब समोर आली आहे. गोपीनाथ तळवलकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

काय उल्लेख करण्यात आला आहे?
”तुकाराम महाराजांची बायको फार रागीट. तोंडाला कुत्रे बांधावे ना तसे, तिच्या तोंडून कायम नेहेमी शिव्याच बाहेर यायच्या. ‘ते आमचं येडं’ असं आपल्या पतीला ती म्हणायची. पण मनाने फार प्रेमळ आणि पतिभक्त. काशी आणि महादू ही त्यांची मुले.” असा उल्लेख या पुस्तकात आहे.

Bhaskar Jadhav Shivaji maharaj
भ्रष्ट लोकांच्या हातून पुन्हा शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी नको – भास्कर जाधव
mukhyamantri vayoshri yojana
‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी पात्रता काय? अर्ज करण्यासाठी कोणती…
Akshay Shinde Encounter
Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू कसा झाला? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
Indurikar Maharaj Statement
Indurikar Maharaj : “धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरीबांच्या पोरांचे बळी..”, इंदुरीकर महाराजांकडून राजकारण्यांची कानउघडणी
Rahul Gandhi criticizes Narendra Modi regarding Shivputla GST demonetisation
पंतप्रधानांनी देशवासीयांचीच माफी मागावी; शिवपुतळा, जीएसटी, नोटाबंदीचा उल्लेख करत राहुल गांधी यांचे टीकास्त्र
police issue lookout notice against sindhudurg shivaji statue artist jaydeep apte
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण; शिल्पकार जयदीप आपटे विरोधात लुकआऊट नोटीस जारी
MVA Protest in Mumbai
MVA Jode Maro Andolan : छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआचं जोडे मारो आंदोलन, ठाकरे-पवारांसह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर
crack at the base of statue of chhatrapati sambhaji maharaj viral on social media clarification given pcmc chief
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाला भेग? महापालिका आयुक्त म्हणतात…

दरम्यान या सगळ्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला असून संत तुकाराम आणि संभाजी महाराजांची बदनामी सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकातून केली जाते आहे. चुकीची माहिती पुढे पसरवली जाते आहे. अशा मजकुरांमधून चुकीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचतो आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे. तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.