अतिवृष्टीचा परिणाम, हंगामास विलंबाची शक्यता

विश्वास पवार, वाई

pune markets crowded
पुणे: पूजा साहित्य, सजावट खरेदीसाठी शहराच्या मध्य भागात गर्दी, नदीपात्रातील रस्ता बंद असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Mavale statue, Shivsrushti Ratnagiri, Ratnagiri city,
रत्नागिरी शहरातील शिवसृष्टीमध्ये मावळ्यांच्या पुतळ्याची विटंबना; संशयित पोलिसांच्या ताब्यात
Dombivli, local train passenger rescued
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट-रूळाच्यामध्ये अडकलेली महिला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे बचावली
Nagpur has lost its status as green city due to the reduction of green cover due to cement roads
नागपूरमध्ये सिमेंट रस्त्यांमुळे हरित आच्छादनात घट, ग्रीन सिटीचा दर्जा हिरावला
Heavy rains in Satara Karad cities
सातारा, कराड शहराला पावसाने पुन्हा झोडपले; पाथरपुंजला साडेबारा इंच असा ढगफुटीसदृश पाऊस
Clash between two generations in virtual and real world
सांधा बदलताना : हा खेळ आभासांचा
Varanavati is relaxed due to the capture of the python while the Karnal area is frightened by the rampage of the leopard
अजगर पकडल्याने वारणावती निर्धास्त, तर कर्नाळ परिसर बिबट्याचा वावराने भयभीत

दरवर्षी पाऊस सुरू झाला, की ऑगस्टच्या मध्यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी उमलून येणारे कासचे पठार यंदा रुसले आहे. सध्या हे पठार केवळ हिरव्या झुडपांमध्ये सुस्त आहे. ऑगस्टमध्ये या पठारावर नित्य उमलणारी आणि दिसणारी अनेक फुले अद्याप उमलली नाहीत. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे  हे घडल्याचे अभ्यासक आणि वनाधिकाऱ्यांचे मत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात या महिन्यात जोरदार पाऊस झाला. पावसाचा सर्वाधिक जोर हा सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ांत होता. यातही ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ात पावसाचा जोर मोठा आणि सातत्यपूर्ण असा होता. या अतिवृष्टीचा फटका यंदा कास पठाराला बसला आहे.

कास पठारावरील आजवरच्या सरासरीपेक्षा कैकपटीने हा अधिकचा पाऊ स कोसळला आहे. या अतिवृष्टीमुळे कास परिसरात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत. या साऱ्यामुळे पठारावर ऑगस्टपासूनच उमलणाऱ्या अनेक प्रजाती यंदा उमलल्याच नाहीत.

बहरासाठी निसर्गाची साथ हवी

सध्या केवळ तीन ते चार जातींचीच तुरळक फुले उमलली आहेत. संपूर्ण पठारावरील बहर येण्यास निसर्गाची साथ आवश्यक आहे. पाऊस थांबला आणि हवामान चांगले राहिले तर सप्टेंबरमध्ये फुले दिसण्याची शक्यता आहे.

– रंजन परदेशी, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, मेढा

अतिवृष्टीचा परिणाम

अतिवृष्टी, उन्हाचा अभाव, उघडीप न मिळणे या अशा कारणांमुळे यंदा प्रथमच कासच्या पठारावर फुलांचे प्रमाण खूप कमी दिसत आहे. जी फुले उमलली आहेत, तीदेखील अतिशय तुरळक आणि अल्पसंख्येने आहेत. गेल्या आठवडय़ापासून पावसाचे प्रमाण कमी झाले असून ते तसेच राहून ऊन पडल्यास सप्टेंबरमध्ये या पठारावर काही प्रमाणात फुले पाहण्यास मिळतील.

– डॉ. संदीप श्रोत्री, कास पठारावरील फुलांचे अभ्यासक

झाले काय?

दरवर्षी साधारण ऑगस्टपासून पठारावर सर्वत्र गेंद, सीतेची आसवं, कापरू, पंद, तेरडा, हिरवी निसुरडी इत्यादी फुले उमलू लागतात. परंतु यंदा अतिवृष्टीमुळे यातल्या अनेक फुलांचे दर्शन अजून घडलेले नाही. जी दिसतात तीदेखील अत्यंत तुरळक प्रमाणात आहेत. खरे तर एरवी या काळात पठारावर सीतेची आसवं किंवा गेंदच्या फुलांचे गालिचे पसरलेले असायचे. परंतु अतिवृष्टीमुळे कासचे नेहमीचे हे असे मनोहारी दर्शन यंदा घडण्याची शक्यता कमी आहे. आता पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यापुढे हवामानाची स्थिती अनुकूल राहिली तरच सप्टेंबरमध्ये पठारावर फुले दिसण्याची शक्यता आहे.