काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी अलीकडेच नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. सत्यजीत तांबेंनी बंडखोरी केल्यानंतर काँग्रेस हायकंमाडने त्यांना निलंबीत केलं आहे. पण त्यांनी अपक्ष उमेदवार उभं राहून निवडणूक जिंकली आहे. या सर्व घडामोडींनंतर सत्यजीत तांबे यांनी होळीनिमित्त काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना खास सल्ला दिला आहे.

होळीनिमित्त राहुल गांधींना काय शुभेच्छा द्याल? असं विचारलं असता सत्यजीत तांबे म्हणाले, “राहुल गांधींना होळीच्या शुभेच्छा देताना मी एवढंच सांगेन की, राहुलजींनी आणखी लोकांमध्ये मिसळून काम करायला हवं. भारत जोडो यात्रेतून त्यांनी हे केलंच आहे. पण अजून त्यांनी लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. लोकांमध्ये आलं-गेलं पाहिजे. यामुळे लोकांच्या मनातील कटू भावना दूर झाल्या पाहिजेत.”

MLA sanjay gaikwad rahul gandhi should apologized to Babasaheb Ambedkar
बुलढाणा : “राहुल गांधींनी बाबासाहेबांची माफी मागावी, तरच…’ संजय गायकवाड यांनी सुचवला पर्याय
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
anil bonde controversial remark on rahul gandhi
राहुल गांधींच्‍या जिभेला चटके देण्‍याच्‍या वक्‍तव्‍यावरून काँग्रेस आक्रमक ; पोलीस आयुक्तांच्या कक्षात ठिय्या
Bapusaheb Pathare, Sharad Pawar group,
अखेर भाजपा नेते बापूसाहेब पठारे यांचा शरद पवार गटात प्रवेश
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
bjp MLA Tarvinder Singh marva give death threat to rahul gandhi
राहुल गांधींना भाजप घाबरते का ? कॉंग्रेसचा सवाल, नागपुरात आंदोलन
bharat jodo yatra create unity in society rahul gandhi claim on 2nd anniversary
भारत जोडो यात्रेमुळे समाजात एकजूट; वर्धापन दिनानिमित्त राहुल यांचा दावा
congress leader plane hijacking
Congress : इंदिरा गांधींसाठी थेट विमान हायजॅक करणाऱ्या काँग्रेसच्या निष्ठावान नेत्याचं निधन, कोण होते भोलानाथ पांडे?

हेही वाचा- Video: “…म्हणून आम्ही कुलूप तोडलं”, ठाण्यातील शिवसेना शाखेवर ताबा घेतल्यानंतर नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया

“विरोधक असो वा सत्ताधारी असो, एकत्र येऊन त्यांनी या देशासाठी कसं चांगलं काम करता येईल, हे आताच्या पिढीतील लोकांना पाहायचं आहे. भारतीय जनता पार्टीने काय केलं? हे ऐकण्यात आता कुणालाही रस राहिला नाही. आपण काय करणार आहोत? पुढे तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही काय करणार आहात? हे ऐकण्यात देशातील जनतेला खऱ्या अर्थाने रस आहे. मला असं वाटतं की जुनं ते सगळं सोडून आपण काय करू शकतो, यावर त्यांनी काम करायला हवं, असं मला वाटतं. बुरा न मानो होली है!” असा सल्ला सत्यजीत तांबेंनी राहुल गांधींना दिला आहे. ते ‘मुंबई तक’शी बोलत होते.