देशात एकीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, कर्नाटक निवडणूक निकालावर जोरदार चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे द केरला स्टोरीवरही अनेक क्रिया प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला असून पश्चिम बंगाल, तमिळनाडूसारख्या राज्यांनी या चित्रपटावरच बंदी आणली आहे. यावरून ठाकरे गटाने महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत. शिवसेनेच्या जडणघडणीत शाहीर साबळेंचे योगदान आहे, परंतु ते एकनाथ शिंदेंना माहिती नसेल असं म्हणत केरला स्टोरीचे तुणतुणे वाजवत भाजपावाले फिरत आहेत, अशीही टीका संजय राऊतांनी केली. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातील रोखठोक या सदरात संजय राऊतांनी टीका केली आहे.

“‘द केरला स्टोरी’ ‘कश्मीर फाईल्स’प्रमाणे वादग्रस्त ठरवली. हा संघाचा सरळ अजेंडा आहे. गुजरात दंगलीवर बनवलेल्या एका डॉक्युमेंटरी फिल्मवर भारतीय जनता पक्षाने बंदी घातली, पण त्याच वेळी ‘कश्मीर फाईल्स’, ‘केरला स्टोरी’सारख्या चित्रपटांचा प्रचार ते करीत आहेत. चित्रपटाचे कथानक निर्घृण आहे. भारतातून ‘इसिस’मध्ये सामील झालेल्या मुली किती निर्दयपणे लोकांच्या हत्या करतात, गळे चिरतात, कोथळे काढतात व त्या सगळय़ास हिंदू-मुसलमान असा रंग देऊन राजकीय पक्ष हिंदुत्वाच्या गर्जना करतात”, असं संजय राऊत म्हणाले.

hindenburg questions sebi chief madhabi buch s silence amid congress claims
सेबी अध्यक्षांवर नव्याने आरोप;प्रतिसादशून्य मौनावरही ‘हिंडेनबर्ग’कडून प्रश्न
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Rajendra Raut, Manoj Jarange patil ,
मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून आघाडीला सत्तेत आणण्याचा डाव, आमदार राजेंद्र राऊत यांचा पुन्हा हल्ला
R Ashwin roasted Pakistan cricket fan for trolling Nitish Reddy
R Ashwin : नितीश कुमार रेड्डीची खिल्ली उडवणाऱ्या पाकिस्तानी चाहत्याला अश्विनने शिकवला चांगलाच धडा, मीम्स व्हायरल
bombay hc refuses to direct cbfc to release certification copy to kangana ranaut emergency
Emergency Movie : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर; प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
Dispute over Emergency movie getting Censor Board certificate in High Court
‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळण्याचा वाद उच्च न्यायालयात
kangana Ranaut is disappointed after the film Emergency did not get Censor Board certification
हतोत्साहित करणारे, अन्यायकारक! ‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे कंगना राणावत निराश
vijay wadettiwar on deepak kesarkar
Vijay Wadettiwar : “शिवरायांचा पुतळा अपघाताने कोसळला” म्हणणाऱ्या दीपक केसरकरांवर विजय वडेट्टीवारांचं टीकास्र; म्हणाले, “अपघाताने आलेल्या सरकारचं…”

“भाजपने, मोदी-शहांनी त्या चित्रपटाचा वापर भाजपच्या प्रचारासाठी केला. मोदींसह सगळेच झुंडी झुंडीने ‘कश्मीर फाईल्स’ पाहायला गेले. महाराष्ट्रात श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट पाहिला की नाही? पण त्यांनी वाजतगाजत ‘प्रोपोगंडा’ करत ‘केरला स्टोरी’ पाहिला आणि महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वणवण भटकणाऱ्या, महाराष्ट्राला जाग आणण्यासाठी डफावर थाप मारणाऱ्या शाहिरांकडे पाठ फिरवली. मुख्यमंत्री शिंदे हे सातारचे. शाहीर साबळेंसारखी महान विभूती साताऱ्यात जन्मास आली व महाराष्ट्राच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान होते. शिवसेनेच्या जडणघडणीतही ते होते. याची माहितीही सातारच्या मुख्यमंत्री शिंदे यांना नसेल, पण ‘केरला स्टोरी’चे तुणतुणे वाजवत आज भाजपवाले फिरत आहेत”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

हेही वाचा >> Video: कर्नाटकात भाजपाच्या पराभवाची ५ प्रमुख कारणं गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

हे आव्हान कोणी स्वीकारेल काय?

“मुळात केरळाची खरी स्थिती काय आहे? केरळात खरेच हिंदू व ख्रिश्चन मुली इस्लामच्या शिकार बनत आहेत का? 32 हजार हिंदू व ख्रिश्चन मुलींना ‘इसिस’मध्ये भरती केले यात तथ्य आहे काय? ‘लव जिहाद’च्या बहाण्याने फसलेल्या निरपराध मुलींना अमानुष हत्यारे बनण्यासाठी मजबूर केले गेले का? इराक, सीरिया, अफगाणिस्तानच्या मार्गाने पुढे सरकलेली ‘केरला स्टोरी’ ही खरेच वास्तव आहे का? हा सगळाच संभ्रम आहे.काँग्रेस नेते शशी थरूर यांनी अत्यंत स्पष्टच सांगितले, 32 हजार महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला व त्या अतिरेकी झाल्या असे कोणी सांगत असतील तर त्यांनी याबाबतचे पुरावे समोर आणावेत व माझ्याकडून 1 कोटी रुपये इनाम घेऊन जावे. हे आव्हान कोणी स्वीकारेल काय?”, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

हेही वाचा >> अग्रलेख : ‘बजरंगा’चा प्रकोप!

ही केरला स्टोरीची सत्य घटना

“‘केरला स्टोरी’ सत्य घटनेवर आधारित असल्याचे दिग्दर्शक सुदीप्तो सेनचे म्हणणे आहे. सत्य असेलही, पण ते इतके अमानुष पद्धतीने कसे दाखवता येईल? ‘कश्मीर फाईल्स’मध्येही तीच अमानुषता होती. ‘केरला स्टोरी’च्या दिग्दर्शकाचा दावा आहे, ’32 हजार मुलींचे लव्ह जिहाद व धर्मांतर झाले. आम्ही त्या भूमिकेवर ठाम आहोत.’ सुदीप्तो सेन यांनी केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्या एका मुलाखतीचा हवाला पुरावा म्हणून दिला. एका मुलाखतीत ओमान चंडी यांनी सांगितले होते की, केरळात प्रत्येक वर्षी 2800-3200 मुली इस्लामचा स्वीकार करतात. गेल्या 10 वर्षांत हा आकडा 32 हजारांवर गेला आहे. या मुली आतंकवादाकडे वळवल्या गेल्या हे कसे उघड झाले? अफगाणिस्तानात तालिबानची धर्मांध राजवट पुन्हा आली. तेव्हा तेथील तुरंगात चार भारतीय महिला कैदी मिळाल्या. तपासात उघड झाले की, या चारही महिलांना ‘इसिस’मध्ये सामील होण्यासाठी अफगाणिस्तानात पाठवले होते. आपापल्या पतीबरोबर या चारही महिला ‘इसिस’मध्ये सामील होण्यासाठी खुरासान प्रांतात पोहोचल्या, पण त्यांच्या नातेवाईकांनी हिंदुस्थान सरकारकडे विनंती केली की, त्यांच्या मुलींना ‘इसिस’च्या तावडीतून सोडवून हिंदुस्थानात आणा, पण हिंदुस्थान सरकारने ते मान्य केले नाही. त्यानंतर त्यांना अफगाणिस्तानातील तुरंगातच राहावे लागले.ही ‘केरला स्टोरी’ची सारांश कथा आहे!”, असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं.

“देशात राजकीय उलथापालथीची शक्यता आहे. सरकारे येतील व सरकारे गडगडतील. त्या सगळय़ा गदारोळात ‘केरला स्टोरी’ खरी की खोटी, हा प्रश्न अधांतरी राहू नये.’कश्मीर फाईल्स’ हा भाजपचाच प्रोपोगंडा चित्रपट होता. ‘केरला स्टोरी’ म्हणजे ‘कश्मीर फाईल्स’चीच पुढली पायरी! पण या सगळय़ात राष्ट्रीय ऐक्य, सामाजिक सद्भावना कोठे हरवून गेली?”, असा प्रश्नही राऊतांनी यानिमित्ताने विचारला आहे.