मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाने केलेल्या आंदोलनं आणि उपोषणांनंतर राज्य सरकारने मराठा समाजासाठी १० टक्के स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली आहे. परंतु, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. यासाठी त्यांनी त्यांचं आंदोलन चालू ठेवलं आहे. अशातच कथित किर्तनकार अजय बारसकर आणि स्री शक्ती संस्थेच्या अध्यक्षा संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे यांनी आरोप केला आहे की, शरद पवार हे मनोज जरांगेंचे बोलविता धनी आहेत. वानखेडे आणि बारसकरांच्या आरोपांचा दाखला देत असेच आरोप सत्ताधारी पक्षदेखील करू लागले आहेत. आज (२७ फेब्रुवारी) विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा