इंदापूर : सध्याचे देशातील सरकार विरोधकांना तुरुंगात टाकून दडपशाही करत आहे. शेतमालाला रास्त हमीभाव मिळण्याच्या मागणीसाठी पंजाब, हरियाणा येथील हजारो शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. परंतु हे सरकार त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाही, अशी विदारक स्थिती देशामध्ये निर्माण झाल्याचा आरोप करून सत्ताधारी पक्षाची दडपशाही मोडून काढा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, संजय जगताप, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे या वेळी उपस्थित होते.

Petitioners against reservation of Maratha society claim in High Court Mumbai news news
मराठा समाजाचे मागासलेपण स्वयंघोषित; आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयात दावा
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
Congress National Spokesperson Supriya Srineet demanded that Eknath Shinde and Devendra Fadnavis resign
शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी
Opposition of Mahavikas Aghadi to development works in Naina area
नैना क्षेत्रातील विकसकामांना महाविकास आघाडीचा विरोध
Neelam Gorhe, Maha vikas Aghadi, Ladki Bahin yojana,
Neelam Gorhe : महिलांचा सरकारवरील विश्वास उडावा म्हणून षडयंत्र, लाडकी बहीण योजनेवर नीलम गोऱ्हे यांचे विधान
band turned violent in protest against atrocities on Hindus in Bangladesh tense silence in nashik after lathi charge by police
बांगलादेशात हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंदला हिंसक वळण; पोलिसांकडून लाठीमार, नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता

हेही वाचा >>>पत्नीने पतीच्या गुप्तांगावर केले वार; बार्शीतील धक्कादायक प्रकार

पवार म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांना संपूर्ण देशामध्ये एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहिले जाते. अशा केजरीवाल यांना देशाच्या पंतप्रधानांवर टीका केली म्हणून, त्याचबरोबर झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनाही या सरकारने तुरुंगात डांबले आहे. असाच प्रयोग खासदार संजय राऊत, अनिल देशमुख यांच्यावरही झाला. अशा घटनांत वाढ होत असतानाच निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचे खाते गोठवण्याचे काम या सरकारने केले आहे. आगामी काळात सर्वसामान्यांचीही बँक खाती हे सरकार बंद करण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कर्नाटकमधील एक खासदार भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य माणसांना जो अधिकार दिला त्या राज्यघटनेवरच आता ही मंडळी हल्ला करत आहेत. म्हणून आता जागरूक होण्याची वेळ आलेली आहे. देशामध्ये एक वेगळी स्थिती निर्माण झाली आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर या सत्तारूढ पक्षाला या निवडणुकीत बाहेर काढा, असे आवाहन त्यांनी केले. 

 थोरात म्हणाले की, ही निवडणूक राज्यघटना, लोकशाही वाचविण्यासाठी आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून सध्या महाराष्ट्रात व देशात चाललेला दहशतवाद मोडून टाका. सुळे म्हणाल्या की, यापूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये गाडय़ा अडवून दमदाटी करण्याचे उद्योग कधी झाले नाहीत. दडपशाहीचे राजकारण करत असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत ‘करेक्ट कार्यक्रम’ करू.