सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारकडे केली आहे. यासाठी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत देण्यात आली आहे. तर, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. याप्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच माजी मंत्री, आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

“शरद पवारांनी एका पत्रात ५२ जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला होता. त्यामुळे खरे ओबीसी नेते शरद पवार आहेत,” असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं आहे. बच्चू कडूंनी गुरूवारी मनोज जरांगे-पाटील यांची रूग्णालयात भेट घेतली. तेव्हा ‘टीव्ही ९ मराठी’शी ते बोलत होते.

Narendra Modi statement that the people of Kashmir are waiting for a terror free government print politics news
काश्मिरी जनतेला दहशतवादमुक्त सरकारची प्रतीक्षा – मोदी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Remove Director General of Police Rashmi Shukla Congress demand to Election Commission print politics news
पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
हरियाणा विधानसभा निवडणूक : चार वर्षांपूर्वी धुमधडाक्यात सुरु केलेली ‘ती’ योजना भाजपासाठी अडचणीची ठरणार?
VHP launches campaign
VHP launches campaign: ‘मुघल-ब्रिटिशांप्रमाणेच सरकारकडून मंदिरांची लूट’, विश्व हिंदू परिषद सरकारविरोधात आंदोलन छेडणार
the cabinet is angry at the behavior of the officials Mumbai
अधिकाऱ्यांच्या चालढकलीवर मंत्रिमंडळाचा संताप
Chandrababu Naidu
Tirupati Laddu Row : “लाडूविषयी मी बोलावं अशी देवाचीच इच्छा असेल”, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं विधान चर्चेत!
TMC MP Jawhar Sircar
TMC MP Jawhar Sircar : तृणमूल काँग्रेस अन् खासदारकीचा राजीनामा देण्याचं कारण काय? जवाहर सरकार यांनी केलं मोठं भाष्य

मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या मुदतीबद्दल सरकारचं शिष्टमंडळ जरांगे-पाटलांची भेट कधी घेणार? याबद्दल विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, “सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे-पाटलांची भेट घेऊन चर्चा करायला हवी होती. जरांगे-पाटलांनी आंदोलन मागे घेतलं नसते, तर सरकारला परिणाम भोगावे लागते असते. सरकारने दिलेला शब्द पाळला पाहिजे.”

हेही वाचा : एकनाथ शिंदेंबरोबर कधीपर्यंत राहणार? बच्चू कडूंचे सूचक वक्तव्य

शिष्टमंडळ न येण्यामागे ओबीसी नेत्यांचा दबाव दिसतो का? असं विचारल्यावर बच्चू कडूंनी म्हटलं, “दबावाचे कारण नाही. थोडीच अमेरिकेतून आणलेल्या लोकांना ओबीसीमधून आरक्षण देतोय. मराठा समाज हा देशातीलच आहे. मराठा समाजाला गृहित धरूनच ओबीसी आरक्षण देण्यात आलं होतं. काहीजण पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ओबीसी आणि मराठा समाजाचं काही देणं-घेणं नाही.”

हेही वाचा : “सगळेच गद्दार, अजित पवार गट ‘खोके-खोके’ म्हणायचे, आता तेच…”, बच्चू कडूंचं मोठं विधान

“शरद पवारांनी एका पत्रामध्ये ५२ जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला होता. खरे ओबीसी नेते शरद पवार आहेत. पण, ५२ जातींमध्ये मराठा समाजाचाही उल्लेख केला असता, तर प्रश्न मिटला असता,” असं बच्चू कडू म्हणाले .