Sharad Pawar on Bhagatsingh Koshyari : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासाठी सर्वोच्च न्यायालयात आज निर्णायक दिवस होता. ८ महिने दोन्ही गटांचे युक्तीवाद आणि प्रतिवाद ऐकून घेतल्यानंतर मार्च महिन्यात सुनावणी पूर्ण झाली. शेवटच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर, या प्रकरणी ज्या घटनापीठाकडे सुनावणी सुरू होती त्या घटनापीठातील एक न्यायाधीश १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे हा निकाल त्याआधीच लागणार असल्याची शक्यता होती. अखेर, आज (११ मे) हा निकाल लागला असून आज सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरच ताशेरे ओढले. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा