Sharad Pawar On Marathi Sahitya Sammelan : दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. तीन दिवस चाललेल्या या संमेलनाला महाराष्ट्रासह दिल्लीत राहणाऱ्या मराठी माणसांनी मोठा प्रतिसाद दिला. मात्र, या मराठी साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर एक आरोप केला. त्यांच्या आरोपावरून चांगलंच राजकारण तापलं. नीलम गोऱ्हे यांच्या विधानावरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. तसेच संजय राऊत यांनी शरद पवार यांनाही काही सवाल केले. या आरोप-प्रत्यारोपामुळे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप अनेकांनी केला. या आरोपासंदर्भात शरद पवार यांना आज पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावर शरद पवार यांनी उत्तर देत आपल्याला हा आरोप मान्य नसल्याचं सांगितलं. तसेच मराठी साहित्य संमेलनात कोण आणि किती राजकीय मंडळी होते? साहित्य संमेलनात कोणते कार्यक्रम झाले आणि त्यासाठी कोण कोण उपस्थित होतं? याची यादीच शरद पवार यांनी वाचून दाखवली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा