केंद्रातील मोदी सरकारनं संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात मोदी सरकार ‘इंडिया’ हा शब्द संविधानातून हटवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य केलं आहे. नाव हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं आहे.

जळगावत शरद पवार यांची सभा पार पडत आहे. त्यापूर्वी शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘इंडिया’ हा शब्द संविधानातून हटवणार असल्याबद्दल शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, “आमच्याकडं तशी माहिती नाही.”

Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
bangladesh seeks extradition of ex pm sheikh hasina
शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न; विद्यार्थी आंदोलनादरम्यान सामूहिक हत्याकांडाचा आरोप
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
BKC, Mumbai police, case aginst Congress workers, protest, PM Narendra Modi, Mumbai, Varsha Gaikwad, black flags, pm narendra modi bkc visit, Mumbai news,
बीकेसी आंदोलनप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
Kolkata Nabanna March Updates Today| Nabanna March Kolkata Doctor Sexual Abuse and Murder Case
Nabanna March Kolkata : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधातील आंदोलन चिघळले, पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्याचा वापर!
case against 300 workers of azad samaj party
आदेश धुडकावून मोर्चा काढल्याप्रकरणी आझाद समाज पार्टीच्या ३०० कार्यकर्त्यांवर गुन्हा

हेही वाचा : “…तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ देणार नाही”, विजय वडेट्टीवार यांची ठाम भूमिका

“मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांच्या प्रमुखांची बुधवारी बैठक बोलावली आहे. त्याबैठकीत याप्रकरणाचा विचार होईल. पण, हे नाव हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही. कोणीही नाव हटवू शकत नाही. सत्ताधारी लोकांना देशाशी निगडीत असलेल्या नावाची एवढी अस्वस्थता का वाटत आहे, हे मला समजत नाही,” असा टोला शरद पवारांनी मोदी सरकारला लगावला.

हेही वाचा : जालना मराठा आंदोलकांवरील लाठीहल्लाप्रकरणी फडणवीसांची माफी, रोहित पवार लक्ष्य करत म्हणाले…

यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. “विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला हे लोक घाबरले आहेत. भाजपाचे लोक भित्रे आहेत. त्यामुळे विषयांना बगल देण्याचं काम ते करतात. ‘इंडिया’ आघाडी मजबूत आहे,” असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.