शिवसेनेत उभी फूट पडल्याने याचा वाद निवडणूक आयोगासमोर सुरु आहे. दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीत युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, सोमवारी (२३ जानेवारी) याबाबत घोषणा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं ठरलं की घोषणा होणार आहे. तसेच, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आमचा विरोध नाही, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

“उद्धव ठाकरेंबरोबर बोलणी सुरु आहे. अधिकृत घोषणा मी किंवा पक्षाच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर करतील. उद्धव ठाकरेंचं ठरलं की घोषणा होईल. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बरोबर घ्यावं असं शिवसेनेला वाटत आहे. दोन्ही पक्षांचं स्वागतचं करु. माझा दोन्ही पक्षांना विरोध नाही आहे,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Deshmukh and Thakur clashed after BJPs Charan Singh thakur halted deshmukhs approved development works
माजी गृहमंत्र्यांची मंजूर कामे भाजप आमदाराने थांबवली
Aaditya Thackeray alleged Sanjay Gupta
Aaditya Thackeray : “हे लज्जास्पद आहे”, शिवसेनेच्या तोतया प्रवक्त्यावर संतापले आदित्य ठाकरे; करणार कायदेशीर कारवाई
ajit pawar and jitendra Awhad (2)
Jitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या, अजित पवारांच्या नेत्याची सुपारी? जितेंद्र आव्हाडांनी ‘त्या’ आकाचं नावच केलं जाहीर!
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
Uddhav Thackeray should introspect says Chandrashekhar Bawankule
उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे! बावनकुळे म्हणाले…
RSS Bhaiyyaji Joshi
“अहिंसेच्या रक्षणासाठी हिंसा करावी लागते”, आरएसएस नेते भैय्याजी जोशींचं वाक्तव्य

हेही वाचा : Vanchit Bahujan Aaghadi: “माझी युती शिवसेनेबरोबर, मला इतरांचं…” प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले!

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबद्दल प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं. तेव्हा शरद पवार यांनी सांगितलं की, “मला याबाबत काही माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही,” असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.

हेही वाचा : प्रकाश आंबेडकर यांचा ‘नवीन घरोबा’ कितपत यशस्वी होणार ?

“तिसरं इंजिन राष्ट्रवादी आहे की मनसे हे…”

“काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला नाकारलं आहे. वंचित आघाडीने फक्त दलितांपुरतं मर्यादित राहावं. ओबीसी आणि गरीब मराठा यांच्यासंदर्भात आम्ही बोलू नये, ही काँग्रेस-राष्ट्रवादीची अट आहे. ती आम्ही मान्य करण्यास तयार नाही आहोत. तसेच, आम्हाला तिसरं इंजिन जोडणार आहे, असं एकनाथ शिंदे मुंबईतील भाषणात बोलले होते. हे तिसरं इंजिन राष्ट्रवादी आहे, की मनसे याचा खुलासा एकनाथ शिंदे करतील,” असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

Story img Loader