सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या विषयावर भाजप, संघ परिवारासह मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ‘ मंदिर वहीं बनायेंगे ‘ म्हणणाऱ्यांनी राम मंदिराची जागा का बदलली, असा सवाल करीत पवार यांनी, जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्याऐवजी भलत्याच प्रश्नांकडे जनतेचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला. सोलापूर लोखसभा मतदारसंघातील मंगळवेढ्यात झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत पवार बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचीही उपस्थिती होती.

पवार यांनी राम मंदिर बांधल्याने जनतेचे मूलभूत प्रश्न संपणार आहेत का, असा सवाल उपस्थित करीत, अयोध्येत मंदिर-मशीद वादावर तकालीन केंद्र सरकारने समन्वयक म्हणून आपल्यावर जबाबदारी सोपविली होती, याची आठवण करून दिली. आम्ही म्हणू तेच खरे, ही भूमिका घेणा-या घेणा-या सत्ताधा-यांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

Congress, Igatpuri, Nana Patole on Igatpuri,
इगतपुरीत काँग्रेस सोडणारे पराभूत हा इतिहास, नाना पटोले यांचा दावा
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
mumbai crime branch to Investigate ncp taluka president s murder in byculla
राष्ट्रवादी तालुका अध्यक्षाच्या हत्येचा तपास गुन्हेशाखेकडे
varsha gaikwad criticized shinde govt
“लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सूत्रधार गुजरातच्या तुरुंगात, मग…”, बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून वर्षा गायकवाड यांचा सरकारवर हल्लाबोल!
Harshvardhan Patil in possession of Indapur Congress Bhawan
हर्षवर्धन पाटील यांच्याकडे इंदापूर काँग्रेस भवनाचा ताबा?
pm narendra modi in maharashtra
“देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे”, वाशिममधील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र; म्हणाले…
mayur mundhe quits bjp
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर बांधणाऱ्या ‘त्या’ भाजपा कार्यकर्त्याची पक्षाला सोडचिठ्ठी; दिलं ‘हे’ कारण
maharashtra government taking rash decisions just to get votes
महायुती सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी कधी? काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा सवाल

हेही वाचा >>>सांगली : राममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त मिरजेत १० दिवस कार्यक्रम – पालकमंत्री खाडे

सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप व मोदी सरकारकडून भावनांच्या मुद्यावरील राजकारणावर टीकास्त्र सोडले. सामाजिक समता आणि सामाजिक सुधारणांचे क्रांतिकार्य बाराव्या शतकात केलेले महात्मा बसवेश्वरांचे वास्तव्य मंगळवेढ्यात होते. याच मंगळवेढ्यात बसवेश्वर स्मारक उभारण्याचा निर्णय यापूर्वीच्या आमच्या सरकारने घेतला होता. परंतु बसवेश्वर स्मारक उभारण्याऐवजी जाती व धर्माच्या नावावर राष्ट्र उभारण्यास निघालेल्या प्रवृत्ती देशाच्या एकता आणि अखंडतेला घातक आहेत. अशा प्रवृत्ती नष्ट केल्या पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले.