बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी मंगळवारी भाजपाला पुन्हा धक्का दिला़ भाजपाशी काडीमोड घेत त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) मुख्यमंत्री म्हणून राजीनामा देऊन राष्ट्रीय जनता दलासह (राजद) अन्य घटकपक्षांच्या महाआघाडीचे नेते म्हणून आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याच राजकीय घडामोडीचा संदर्भ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी जोडत भाजपावर टीका केली आहे. शरद पवार यांनी आज पत्रकारांशी चर्चा करता श्रीलंकेपासून ते बिहारमधील राजकीय घडामोडीपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं. मात्र यावेळी त्यांनी शिवसेना दुबळी करण्याचं नियोजन भाजपाने केलं आणि त्याला एकनाथ शिंदे व इतर लोकांनी मदत केल्याचं मत व्यक्त केलं आहे.
नक्की वाचा >> Photos: “…म्हणून संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश केला”; पूजा चव्हाण प्रकरणावरुन टीकेच्या पार्श्वभूमीवर CM शिंदेंचा खुलासा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा