२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी घेतला होता. या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. या शपथविधीबाबत अद्याप अनेक गूढ कायम आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सूचना केली होती, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केलं. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, भाजपाचा तत्कालीन मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने सरकार स्थापनेसाठी पक्षाला पाठिंबा देण्यास नकार दिला. यामुळे सत्तेवर कोण येणार? असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी शरद पवारांनी भाजपाशी संपर्क साधला आणि राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपाने युती करावी, असं सुचवलं, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये केलं आहे.

President Draupadi Murmu on Maharashtra tour
राष्ट्रपती मुर्मू आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
Prithviraj Chavan : “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली, कारण..”, माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
amol kolhe on pm narendra modi
Amol Kolhe: “पुतळ्यानं स्वतःहूनच मान टाकली…”, पंतप्रधान मोदींच्या माफीनाम्यानंतर डॉ. अमोल कोल्हेंची कवितेमधून प्रतिक्रिया
DCM Devendra Fadnavis On Pm Narendra Modi
Devendra Fadnavis : “पालघरमध्ये तिसरं मोठं विमानतळ उभारा”, देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी
vijay wadettiwar
Vijay Wadettiwar : “महायुतीचा भ्रष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर”; शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यावरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल; म्हणाले…
rohit pawar
Rohit Pawar : राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, “उद्या महाराष्ट्रात येत आहात, तर…”
Sharad Pawar On Maharashtra bandh
Maharashtra Bandh : ‘उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घ्या’, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवारांचं आवाहन

हेही वाचा- “…आता तुम्ही गप्प बसा”, शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीवर मनोज जरांगेंची रोखठोक भूमिका

फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, शरद पवारांनीच राज्यात काही काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी सूचना केली होती. जेणेकरून राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना भाजपाशी युती करण्याबाबत माहिती मिळू शकेल. मात्र, सर्व वाटाघाटी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा- “पारदर्शक आणि निष्पक्ष राहा, सूड भावनेनं कारवाई नको”, सुप्रीम कोर्टाची ईडीवर तिखट टिप्पणी

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यात जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू होते. तेव्हा प्रत्येक राजकीय पक्षाला सरकार बनवायचं आहे का? असे पत्र दिलं जातं. राष्ट्रवादीला जे पत्र मिळालं, ते पत्र मीच लिहिलं होतं. ते माझ्या घरी टाईप करण्यात आलं होतं. या पत्रात शरद पवारांनी काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या. त्या दुरुस्त्या केल्यानंतर राष्ट्रवादीही सरकार स्थापन करण्यास इच्छुक नाही, असं पत्र दाखल करण्यात आलं. त्यानंतरच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.